शहरं
Join us  
Trending Stories
1
कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
2
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
3
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
4
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
5
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
6
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
7
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
8
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
9
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
10
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
11
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
12
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
13
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
14
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
15
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
16
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
17
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
18
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
19
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
20
Anudan Scheme: म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्या पाळा; सरकारकडून ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, योजना कोणती?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपावर कुरघोडीची सेनेची तयारी

By admin | Updated: December 15, 2015 22:45 IST

दुष्काळ : उद्धव ठाकरेंसह मंत्री, आमदारांचा गट जिल्हा दौऱ्यावर

नाशिक : शेतकरी आत्महत्त्येच्या जिल्ह्यात वाढलेल्या घटना, अपुऱ्या पावसामुळे अडचणीत आलेले शेतकरी व पाणीटंचाईचे भीषण संकट पुढे उभे ठाकले असताना भाजपाचे पालकमंत्री असलेल्या नाशिक जिल्ह्यात शिवसेनेने कुरघोडी करण्याची तयारी केली आहे. मराठवाड्याप्रमाणेच उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्री व आमदार येत आहे.या दौऱ्यात शासकीय यंत्रणांच्या बैठका घेऊन त्यांना कार्यान्वित करण्यात करण्यात येणार आहे.
या दौऱ्यात सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासह शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील विधान परिषद व विधानसभेचे सदस्य सहभागी होणार आहेत. मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर अशाच प्रकारे शिवसेनेचे मंत्रिगट गेलेले असताना त्यावर भाजपाने आक्षेप घेत खिल्ली उडविली होती व त्यातून बरेच राजकीय वातावरण तप्त झाले होते, त्याच धर्तीवर सेनेच्या मंत्री, आमदारांची नाशिक भेटही गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक जिल्ह्णात चालू वर्षी ६० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी भाजपाचा एकही मंत्री वा आमदार जिल्ह्णात फिरकला नाही. अशा परिस्थितीत सेनेने थेट मंत्र्यांसह आमदारांनाच शेतकऱ्यांच्या उंबरठ्यापर्यंत नेण्याचे ठरविले आहे. शिवाय सरकारी यंत्रणेला कामाला लावून त्याचा राजकीय फायदाही या दौऱ्यात पदरात पाडून घेणे शक्य होणार आहे. भाजपाने काही केले नाही, पण आम्ही तुमच्या मदतीला धावून आलो, असा संदेश या माध्यमातून जाण्याची व्यवस्था सेनेने केली आहे.

शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करणार
शुक्रवारी सायंकाळपर्यंत नाशिकला येणाऱ्या सेनेच्या मंत्रिगटाने शनिवारी शासकीय यंत्रणेची बैठक बोलविली आहे. या बैठकीत पाणीटंचाई व त्या संदर्भातील उपाययोजना, टॅँकरस्थिती, शेतकरी आत्महत्त्या, रोजगार हमी योजनेच्या कामांची मागणी, दुष्काळसदृश जाहीर केलेल्या गावांसंदर्भात प्रस्तावित उपाययोजना, चारा टंचाई, कृषी वीजजोडणी संदर्भातील माहिती, शेतकऱ्यांच्या विविध योजनांची अंमलबजावणी, जलयुक्त शिवार योजनेची कामे, कांदाचे उत्पादन व भाव याचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीनंतर ही समिती काही गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधतील त्याचबरोबर आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहे.