शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

नाशकात टमाटा व्यापाऱ्याला पिस्तूल लावून खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 3:18 PM

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाटा खरेदी विक्रीचे व्यवहार  करणाऱ्या एका टमाटा व्यापाऱ्याला तिघा संशयित आरोपींनी डोक्याला पिस्तूल लावून डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न करीत सायंकाळपर्यंत 50 हजार रुपये दिले नाही तर जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.15) सकाळी सात वाजेच्या सुमारास घडला आहे.

ठळक मुद्दे टमाटा व्यापाऱ्याला पिस्तूल लावून खंडणीची मागणी शेतकऱ्यांकडून माल न घेताच व्यापारी परतले माघारीबाजार समितीतील व्यापाऱ्यांमध्ये गुंडांची दहशत

नाशिक : दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाटा खरेदी विक्रीचे व्यवहार  करणाऱ्या एका टमाटा व्यापाऱ्याला तिघा संशयित आरोपींनी डोक्याला पिस्तूल लावून डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न करीत सायंकाळपर्यंत 50 हजार रुपये दिले नाही तर जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.15) सकाळी सात वाजेच्या सुमारास घडला आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळच्या सुमाराला घडलेल्या घटनेमुळे शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्या शेकडो व्यापारी, आडत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून दुपारी नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या सर्व संचालक मंडळाने पोलीस ठाण्यात धाव घेत झाल्याप्रकाराबाबत तपास करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन दिले आहे. बाजारसमितीत खंडणी मागणारे आरोपी दुचाकीवरून आल्याचे बाजारसमिती कॅमेऱ्यात कैद झाले आहे. काही दिवसांपूर्वी एका युवकाचा खून प्रकरणात सहभाग असलेले संशयित व त्यांचे हस्तक बाजारसमितीतील व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुली करीत असल्याचे व्यापाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखविले आहे. या प्रकारामुळे  बाजारसमितीत व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण पसरले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्यामाहितीनुसार,  बाजारसमितीत  सोमवारी सकाळी बाजारसमितीत टमाटा व्यापारी त्याच्या गाळ्यात असताना ऍक्टिव्हा दुचाकीवरून तिघे भामटे आले त्यांनी थेट त्या व्यापाऱ्याच्या गाळ्यात जाऊन त्याला शिवीगाळ करीत हातातील पिस्तूल डोक्याला लावून तर अन्य एकाने हातात दगड घेत डोक्यात मारण्याचा प्रयत्न करून संध्याकाळपर्यंत 50 हजार रुपये खंडणी दे नाहीतर जिवंत ठार मारू अशी धमकी दिली. सदर प्रकरणानंतर त्या व्यापाऱ्याने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. दरम्यान,अशा प्रकारे व्यापाऱ्याकडे खंडणी मागण्याचा प्रकार घडल्याने तसेच दोन ते तीन शेतकऱ्यांना मारहाण केल्यामुळे भयभीत झालेल्या 5 ते 6 व्यापाऱ्यांनी शेतमाल वाहनात न भरताचं बाजारसमितीतून काढता पाय घेतला. बाजारसमितीत गेल्या काही महिन्यांपासून गुंडाराज वाढला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे टोळके व खून प्रकरणातील संशयित व आरोपींचे हस्तक व्यापारी, आडत्यांना धमकी देत खंडणी वसूल करत असल्याचा धक्कादायक खुलासा व्यापाऱ्यांनी केला आहे. गुंड प्रवृत्तीचे टोळके शेतकऱ्यांना मारहाण करून त्यांचा शेतमाल पळविणे, पैसे काढून घेणे असा प्रकार करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसMarketबाजार