शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

भारातातील ६४ पैकी वक्तृत्व महत्वाची कला : निलिमा पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 3:51 PM

वक्तृत्व कलेचे जनक महर्षी व्यास यांनी ज्ञानदानाचे महत्व पटवून दिल्याने आपण ज्ञानदानाच्या जागेस व्यासपीठ असे संबोधतो, कृष्णाने देखील अजुर्नाच्या रथाचे सारथ्य करतांना त्यास आपल्या वक्तृ त्वातून दिशादर्शन केले. वाणी आणि विचारांचे महत्व त्यांनी पटवून दिले,त्यामुळे आपल्या भारतातील ६४ कलांमध्ये वक्तृत्व कलेला महत्वाचे स्थान असल्याचे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलीमा पवार यांनी केले. 

ठळक मुद्देमविप्र करंडक अखिल भारतीय वक्तृत्व स्पर्धेला प्रारंभदेशभरातून १५० स्पर्धकांचा सहभाग 

नाशिक: वक्तृत्व कलेचे जनक महर्षी व्यास यांनी ज्ञानदानाचे महत्व पटवून दिल्याने आपण ज्ञानदानाच्या जागेस व्यासपीठ असे संबोधतो, कृष्णाने देखील अजुर्नाच्या रथाचे सारथ्य करतांना त्यास आपल्या वक्तृ त्वातून दिशादर्शन केले. वाणी आणि विचारांचे महत्व त्यांनी पटवून दिले,त्यामुळे आपल्या भारतातील ६४ कलांमध्ये वक्तृत्व कलेला महत्वाचे स्थान असल्याचे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलीमा पवार यांनी केले. रावसाहेब थोरात सभागृहात तेराव्या ‘मविप्र करंडक’ अखिल भारतीय वक्तृृत्व स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी (दि. २१) झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते यांच्यासह चिटणीस डॉ.सुनिल ढिकले,संचालक नाना महाले,भाऊसाहेब खातळे, डॉ.प्रशांत देवरे, प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे,  प्रा.नानासाहेब दाते, गुलाब भामरे, शिक्षणाधिकारी डॉ.डी.डी.काजळे,डॉ.एन.एस.पाटील,प्रा.एस के.शिंदे,सी.डी.शिंदे आदी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये वक्त्याला जेवढे महत्व आहे तेवढेच श्रोत्यालाही असल्याचे निलमा पवार यानी नमूद केले. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व वक्तृृत्व कलेत त्यांचा विकास व्हावा या दृष्टीकोनातून डॉ.वसंत पवार यांनी मविप्र करंडक स्पर्धेती मूहर्तमेढ रोवल्याचे माणिकराव बोरस्ते यांनी अध्यक्षीय मनोगतत व्यक्त करताना सांगितले. प्रास्ताविक स्पर्धाप्रमुख डॉ.डी.पी.पवार यांनी केले. सूत्रसंचलन प्रा.तुषार पाटील यांनी केले.  उपप्राचार्य डॉ.एम.बी.मत्सागर यांनी आभार मानले.

१५० स्पर्धकांचा सहभाग मविप्र करंडक वक्तृत्व स्पर्धेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता : नवी दिशा , महात्मा गांधी : जागतिक परिप्रेक्ष्य, चला जलचिंतन करूया, जगावं की मरावं,हाच प्रश्न आहे,  कहते है कि गालिब का अंदाज-ए-बयाँ और है!  हे विषय आहेत. या विषयांवर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून स्पर्धेत सहभागी झालेले१५० स्पर्धक आपले विचार व्यक्त करणार आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थी