शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
5
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
6
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
7
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
8
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
9
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
10
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
11
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
12
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
13
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
14
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
15
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
16
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
17
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
18
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
19
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
20
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

कांदा गडगडला

By admin | Updated: January 2, 2017 23:12 IST

येवला : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

येवला : शेतमालाला सरकारच्या आडमुठे धोरणामुळे शेती आणि शेतकऱ्याला अवकळा आली आहे. याचा निषेध करून, उत्पादन खर्चावर आधारित कांद्याला १५०० रु पये हमीभाव देण्यात यावा आणि  उत्पादन अधिक असल्याने निर्यात वाढवावी यासह शेतकरीहिताच्या न्याय्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येवला-मनमाड राज्य महामार्गावर येवला कृषी
उत्पन्न बाजार समितीसमोर सोमवारी दुपारी १ वाजता रास्ता रोको आंदोलन केले.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार एस. ए. पठारे यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. दरम्यान, या रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सहायक पोलीस निरीक्षक विश्वास निंबाळकर यांच्यासह पोलीस पथकाने मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. निवेदन शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन नायब तहसीलदार यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.  कांद्याच्या घसरत असलेल्या भावाबाबत चिंता व्यक्त करून सोमवारी दुपारी रास्ता रोको करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. कांद्याला हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसह शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर येवला- मनमाड राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन झाले.  सरकारच्या आडमुठे धोरणामुळे शेती आणि शेतकऱ्याला अवकळा आली आहे. हातात काही मिळाले नाही. परंतु गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात निसर्गाने शेतकऱ्यांवर
मोठी कृपा केली आहे. कांदा   पिकाची उत्पादन क्षमताही वाढलेली आहे.  गेला तीन वर्षे लागोपाठ पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी आपले कर्ज फेडू शकला नाही. आज शेतकऱ्यांकडे पीक मुबलक आहे, परंतु सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्वात जास्त अडचणीत शेतकरी सापडलेला आहे.  मार्केटमध्ये विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे २४ तासात संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात यावे तसेच सन २०१४-१५ मधील कांदा चाळ अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, येवला तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी रोहित्र जळालेले असतील त्या ठिकाणच्या बिलाची मागणी न करता रोहित्र दुरुस्त करण्यात यावे, जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सरकारने टाकलेले निर्बंध उठवण्यात यावे, कांद्याला किफायतशीर भाव मिळावा आदि मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनात केल्या आहेत.  निवेदनावर तालुकाध्यक्ष श्रावण देवरे, सरचिटणीस रवींद्र तळेकर, बाबासाहेब पैठणकर, पप्पू  जानराव, गोरख हजारे, भाऊसाहेब गरुड आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)