शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

ऑक्टोबर महिन्यामध्ये  झाला १२६ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 10:21 PM

परतीच्या ऑक्टोबर महिन्याच्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असून, तीन आठवड्यातच जवळपास १२६ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसाने जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीतही वाढ झाली असली तरी, गेल्या वर्षाच्या तुलनेत हा पाऊस कमीच आहे.  ऑक्टोबर महिन्याच्या पावसाला परतीचा वा अवकाळी पाऊस म्हणूनही संबोधले जाते. 

ठळक मुद्दे पिकांना मोठा फटका : जिल्ह्यात सरासरी १०९ टक्के नोंद

नाशिक : परतीच्या ऑक्टोबर महिन्याच्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असून, तीन आठवड्यातच जवळपास १२६ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसाने जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीतही वाढ झाली असली तरी, गेल्या वर्षाच्या तुलनेत हा पाऊस कमीच आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पावसाला परतीचा वा अवकाळी पाऊस म्हणूनही संबोधले जाते. नाशिक जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात ९२३ मिलीमीटर पावसाची यापूर्वीची नोंद करण्यात आली असून, यंदा मात्र १ ते २२ ऑक्टोबर दरम्यान ११७२ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. त्याची टक्केवारी १२६ इतकी आहे. जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान वार्षिक पर्जन्यमान १५९२८ मिलीमीटर इतके असून, आजवर १७,४५७ मिलीमीटर इतका म्हणजेच वार्षिक पर्जन्यमानाच्या १०९ टक्के इतकी पावसाची नाेंद झाली आहे. सध्या सुरू असलेला पाऊस परतीचा वा अवकाळी म्हणून ओळखला जात असला तरी, दरवर्षी या पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान होते. शेतकऱ्यांनी जून, जुलैमध्ये पेरणी केलेले पीक ऑक्टोबर महिन्यात काढणीला आलेले असताना पावसामुळे शेतातील पीक झोपते तर ज्यांनी अगोदर काढून ठेवलेले खळ्यावरचे पीक पावसाच्या पाण्यात  भिजून नुकसान होते. दरम्यान, झालेल्या पावसामुले अनेक ठिकाणी शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तत्काल पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त भागातील शेतकर्यांनी केली आहे. तसेच अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून अनेकांना बेघर होण्याची वेल आली असून त्यांचेही पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.  गेल्या वर्षी जिल्ह्यात १८ ऑक्टोबरपासून हजेरी लावलेल्या अवकाळी पावसाने तब्बल पंधरा दिवस मुक्काम ठोकला होता. त्यामुळे द्राक्ष, मका, सोयाबीन, भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. शासनाला पीक पंचनामे करण्याचे आदेश द्यावे लागले होते. यंदादेखील या अवकाळी पावसाने भात, द्राक्ष बागांचे मोठे नुकसान केले आहे.

टॅग्स :Rainपाऊस