शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

पोषण आहार चवीची ‘खिचडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:03 IST

शालेय पोषण आहार बनविणे, वितरित करणे आणि तपासणीबाबत शालेय शिक्षण विभागाकडून आजवर अनेक निर्णय घेण्यात आले आणि काही बदलण्यातही आले. पोषण आहारातील हा प्रयोग अजूनही सुरूच असून, आता पोषण आहाराची चव तपासण्याच्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांना वगळण्यात आले आहे.

नाशिक : शालेय पोषण आहार बनविणे, वितरित करणे आणि तपासणीबाबत शालेय शिक्षण विभागाकडून आजवर अनेक निर्णय घेण्यात आले आणि काही बदलण्यातही आले. पोषण आहारातील हा प्रयोग अजूनही सुरूच असून, आता पोषण आहाराची चव तपासण्याच्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांना वगळण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आहारावरील नियंत्रण कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे चव तपासण्यासाठीची यंत्रणा अस्तित्वात असली तरी या यंत्रणेकडून खरोखरच आहाराची तपासणी होते का? हाही मोठा प्रश्नच आहे.  शालेय विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार मिळावा यासाठी शासनाने नियमावली तयार केलेली आहे. या नियमावलीनुसार शालेय विद्यार्थ्यांना सकस आहार दिला जातो की नाही हे तपासण्याची जबाबदारी शाळापातळीवर निश्चित असताना यातून आता मुख्याध्यापकांना वगळण्यात आल्याने पोषण आहाराचा दर्जा तपासण्याबाबत काहीशी शिथिलता निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्याध्यापकांवरील कामाचा ताण पाहता त्यांना या जबाबदारीतून मुक्त करून त्यांच्यावरील भार हलका करण्यात आलेला आहे.शालेय पोषण आहार योजना राबविताना मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची चव मुख्याध्यापकांनादेखील घ्यावी लागत होती. आहाराची प्रथमस्तरावर चव आहार तयार करणारा स्वयंपाकी, दुसºया स्तरावर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, तर शेवटी तिसºया स्तरावर मुख्याध्यापक यांच्यावर चव घेण्याची जबाबदारी होती. परंतु मुख्याध्यापकांवरील अन्य कामाचा ताण पाहता खिचडीची चव घेण्याच्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांना वगळण्यात यावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती. अनेक वर्षांपासून याबाबत शासनदरबारी मुख्याध्यापकांचा प्रयत्न सुरू होता.  आता काही अटींमध्ये शासनाने शिथिलता आणली असून मुख्याध्यापकांना दिलासा देण्यात आला आहे. चव चाखण्यासाठी तीन स्तरावर होणारी सक्ती आता कमी करण्यात आलेली आहे. आहाराची चव आता शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शाळांचे मुख्याध्यापक किंवा योजनेशी शिक्षक यापैकी केवळ एकानेच चव घ्यावी, असे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे मुख्याध्यापकांवरील सक्ती कमी झाली आहे.तपासणी शाळास्तरावरच अवलंबूनअस्तित्वात असलेली यंत्रणा आणि नवी यंत्रणा खरोखरच पोषण आहाराची चव घेते का? हा संशोधनाचा विषय आहे. पोषण आहाराची चव खरोखरच तपासली जाते की नाही याची तपासणी न होता केवळ ‘चव नोंद’ वहीच तपासली जाते, असे आजवरचे चित्र राहिले आहे.

टॅग्स :Schoolशाळाfoodअन्नStudentविद्यार्थीNashikनाशिक