शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
5
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
6
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
7
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
8
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
9
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
10
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
11
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
12
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
13
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
14
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
15
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
16
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
17
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
18
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
19
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
20
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

उत्तर महाराष्ट्रात खरिपाच्या ९५ टक्के पेरण्या पूर्ण

By admin | Updated: August 26, 2016 23:58 IST

समाधानकारक पाऊस : डाळींची लागवड वाढली

नाशिक : राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने उत्तर महाराष्ट्रात खरिपाच्या ९५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे अनेक खरीप पिकांच्या पेरण्या शंभर टक्क्यांहून अधिक झाल्या आहेत. डाळींची लागवडदेखील अधिक झाली आहे.गेल्या वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस नव्हता. अगदी पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसे पाणी नसल्याने नाशिकचे पाणी औरंगाबाद येथे जायकवाडी प्रकल्पासाठी सोडण्यावरून संघर्ष निर्माण झाला होता. खरीप पिक तर हातचे गेले होते. यंदा नाशिकसह धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्ये पावसाने सुरुवातीला ओढ दिली. त्यामुळे शेतकरी चिंतित होते. परंतु त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. जुलै आणि आॅगस्ट महिन्याच्या महिन्यापर्यंत चांगला पाऊस झाला. त्यामुळे खरिपाची पेरणी वाढली आहेत. सध्या नाशिक विभागात ९४.८८ टक्के इतकी पेरणी झाली आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांनी कापूस, उडीद, मूग, सोयाबीनची लागवड झाली होती. पावसानंतर सोयाबीन, कापूस, तूर यांची लागवड शंभर टक्क्यांवरून अधिक लागवड झाली आहे. शासनाने कडधान्य लागवडीसाठी मोठे अभियान राबविले होते. त्यातच कडधान्यांची मागणी वाढल्याने आणि कडधान्याचे दर वाढत असल्याने उत्तर महाराष्ट्रात कडधान्य लागवडीकडे यंदा कल वाढल्याचे चित्र आहे. अर्थातच अशा पिकामुळे डाळींचे उत्पन्न वाढून दर आटोक्यात राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)