शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

उत्तर महाराष्ट्रात खरिपाच्या ९५ टक्के पेरण्या पूर्ण

By admin | Updated: August 26, 2016 23:58 IST

समाधानकारक पाऊस : डाळींची लागवड वाढली

नाशिक : राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने उत्तर महाराष्ट्रात खरिपाच्या ९५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे अनेक खरीप पिकांच्या पेरण्या शंभर टक्क्यांहून अधिक झाल्या आहेत. डाळींची लागवडदेखील अधिक झाली आहे.गेल्या वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस नव्हता. अगदी पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसे पाणी नसल्याने नाशिकचे पाणी औरंगाबाद येथे जायकवाडी प्रकल्पासाठी सोडण्यावरून संघर्ष निर्माण झाला होता. खरीप पिक तर हातचे गेले होते. यंदा नाशिकसह धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्ये पावसाने सुरुवातीला ओढ दिली. त्यामुळे शेतकरी चिंतित होते. परंतु त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. जुलै आणि आॅगस्ट महिन्याच्या महिन्यापर्यंत चांगला पाऊस झाला. त्यामुळे खरिपाची पेरणी वाढली आहेत. सध्या नाशिक विभागात ९४.८८ टक्के इतकी पेरणी झाली आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांनी कापूस, उडीद, मूग, सोयाबीनची लागवड झाली होती. पावसानंतर सोयाबीन, कापूस, तूर यांची लागवड शंभर टक्क्यांवरून अधिक लागवड झाली आहे. शासनाने कडधान्य लागवडीसाठी मोठे अभियान राबविले होते. त्यातच कडधान्यांची मागणी वाढल्याने आणि कडधान्याचे दर वाढत असल्याने उत्तर महाराष्ट्रात कडधान्य लागवडीकडे यंदा कल वाढल्याचे चित्र आहे. अर्थातच अशा पिकामुळे डाळींचे उत्पन्न वाढून दर आटोक्यात राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)