शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

नांदूरमधमेश्वरसह कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात ‘नो-एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 20:42 IST

विनापरवाना पर्यटकांची वाहने अभयारण्य क्षेत्रात आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून तत्काळ त्यांना अभयारण्यक्षेत्रातून बाहेर काढले जावे यासाठी चौकसपणे नियमित गस्त वाढवावी, असेही आदेशात त्यांनी म्हटले आहेत.

ठळक मुद्देआदेश मंगळवारपासून लागू होणार आहे३१ मार्चपर्यंत संपूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश चारही अभयारण्यांचे प्रवेशद्वार संपूर्णत: बंद

नाशिक : राज्यात कोरोना आजाराची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा ३९ वर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र दक्षता घेतली जात असून, खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक वनवृत्त विभागाचे मुख्य वनसंरक्षक तथा वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी नांदूरमधमेश्वर, कळसूबाई-हरिश्चंद्रगड, यावल आणि अनेर डॅम हे चारही अभयारण्य ३१ मार्चपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश सोमवारी (दि.१६) काढले.नाशिकच्या निफाड तालुक्यातील प्रसिद्ध नांदूरमधमेश्वरसह अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा पर्यटन क्षेत्रातील कळसूबाई हरिशचंद्रगड अभयारण्य, धुळे जिल्ह्यातील अनेरडॅम, जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्यात मोठ्या संख्येने पर्यटकांचा राबता असतो. त्यामुळे नाशिक वन्यजीव विभागाने या चारही अभयारण्यांचे प्रवेशद्वार मंगळवारपासून येत्या ३१ मार्चपर्यंत संपूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. याबाबतची सूचनापत्रक संबंधित वनपरिक्षेत्राच्या वनक्षेत्रपालांना रवाना करण्यात आले आहे. या अभयारण्यक्षेत्रात पर्यटकांची कुठल्याहीप्रकारे गर्दी होणार नाही, यासंबंधित दक्षता घेतली जावी, असे अंजनकर यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे. पर्यटकांची वाहने अभयारण्यक्षेत्रात तपासणी नाक्यांवरून कोणत्याही मार्गाने प्रवेश करणार नाहीत, याबाबत संबंधित वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षकांनी काटेकोरपणे काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. विनापरवाना पर्यटकांची वाहने अभयारण्य क्षेत्रात आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून तत्काळ त्यांना अभयारण्यक्षेत्रातून बाहेर काढले जावे यासाठी चौकसपणे नियमित गस्त वाढवावी, असेही आदेशात त्यांनी म्हटले आहेत. हा आदेश मंगळवारपासून लागू होणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnandurmadhmwshwerनांदूरमधमेश्वरwildlifeवन्यजीवtourismपर्यटनforest departmentवनविभाग