शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात द्राक्ष पंढरीची उपेक्षा; ऑनियन क्लस्टरही विस्मरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:44 IST

नाशिक : कोरोनाच्या संकटात भारतीय अर्थव्यवस्थेला शेती क्षेत्राने तारल्याचे निरीक्षण आर्थिक सर्वेक्षणात नोंदविले गेले. त्यामुळे या वर्षाच्या अर्थसंकल्पात शेती ...

नाशिक : कोरोनाच्या संकटात भारतीय अर्थव्यवस्थेला शेती क्षेत्राने तारल्याचे निरीक्षण आर्थिक सर्वेक्षणात नोंदविले गेले. त्यामुळे या वर्षाच्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी भरघोस तरतूद होण्याची अपेक्षा होती . परंतु, ही आशा नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी क्षणभंगूरच ठरली. अर्थसंकल्पात नाशिकच्या द्राक्ष, कांदा, डाळींब यासारख्या पिकांच्या अनुषंघाने कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची निराशा झाली असून शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

नाशिकमधील द्राक्ष, कांदा व डाळींब यासारख्या कृषी उत्पादानांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थान मजबूत करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून निर्यात केंद्र, कोल्ड स्टोरेज यासारख्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद होणे शेतकऱ्यांना अपेक्षित होते. त्याचप्रमाणे केंद्र सरकारनेच नाशिक जिल्ह्यात ऑनियन क्लस्टरची घोषणाही केली होती. त्यामुळे अर्थसंकल्पात त्यासाठी भरीव तरतूद जिल्ह्यातील कांदा उत्पादन शेतकऱ्यांना अपेक्षित होती.मात्र ही योजनाही विस्मरणात गेल्याचे दिसून येत असून यासंदर्भातही कोणतीही तरतूद झालेली नाही. मात्र, यावर्षीच्या अर्थसंकल्पात परंपरागत सूक्ष्म सिंचनासाठी निधी वाढविणे, पतपुरवठ्याचा निधी वाढविणे, आधुनिक पायाभूत सुविधांसाठी निधी वाढविणे, अशा ठरावीक तरतुदी करतानाच कृषी विकासासाठी पायाभूत सुविधांवर भर देणे, जागतिक बाजारात भारतीय शेतमालाचे स्थान उंचावणे, शेतीक्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रत्यक्षात काहीच तरतूद झालेली नाही.

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांची कोट्यवधींची फसवणुकीचे प्रकार घडत असताना त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि अशा घटनेत शेतकऱ्यास नुकसानभरपाईच्या दृष्टीने अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नाही. शेतमाल बाजारात येण्यापूर्वी साठवणुकीच्या, वाहतुकीच्या, प्रक्रियेच्या आणि निर्यातीच्या नव्या व्यवस्था निर्माण होण्यासाठी भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता होती. त्या दिशेनेही काहीही झालेले दिसत नाही. - संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना

कांद्याचे बाजारभाव वाढल्यानंतर केंद्र सरकार निर्यातबंदी करून दरवर्षी देशातील कांदा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करते. त्यामुळे कांद्याला उत्पादनखर्चापेक्षा कमी दर मिळाल्यानंतर कांदा उत्पादकांना अनुदान देण्यासाठी विशेष तरतूद करण्याची गरज होती. सर्वाधिक कांदा उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना कांदा निर्यात करण्यासाठी मुंबईसह, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे येथे थेट कांदा निर्यात केंद्र उभारणी करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतुद करणे गरजेचे होते; परंतु अर्थसंकल्पात कांदा उत्पादकांना दुर्लक्षितच केले आहे.

-भारत दिघोळे, अध्यक्ष, -राज्य कांदा उत्पादक संघटना.