शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

भाजपा मंत्र्याची राष्ट्रवादी मुक्त ची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 1:39 PM

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप हा जनेतच्या आदेशाचा महाकुंभ असून जनतेचा हा संकल्प घेऊन भाजपा ...

नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप हा जनेतच्या आदेशाचा महाकुंभ असून जनतेचा हा संकल्प घेऊन भाजपा राज्यातील निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची भुमिका भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी नाशिकमध्ये मांडली. दरम्यान, कॉँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी मुक्तची घोषणा मंत्र्यांनी केली.पंचवटीतील तपोवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत होत आहे. तत्पूर्वी झालेल्या भाषणांमध्ये भाजपाच्या मंत्र्यांनी महाजनादेश यात्रा म्हणजे महाराष्टत पुन्हा देवेंद्र सरकार स्थापन करण्याचा संकल्प असल्याचे जाहिर केले. यावेळी अनेक नेत्यांनी नाशिकधील कुंभमेळा भूमीतून जनतेच्या आदेशाचा कुंभ घेऊन राज्यभरात जाणार असल्याचे सांगितले. काही नेत्यांनी महाराष्टतून राष्ट्रवादी मुक्त ची घोषणा केली.अनेक नेत्यांनी नरेंद्र मोदी हे देशातील सक्षम नेतृत्व असल्याचे सांगून कॉंग्रेसवर चौफेर टिका करीत कॉँग्रेस राष्टÑवादीने देशात जातीपातीचे राजकारण केल्याचा आरोप केला. पुढील पाच वर्षात राज्यात सुवर्णकलश बसविण्याची घोषणा करीत तरुण आणि बेराजगारांचे स्वप्न पुर्ण करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. शेतकरी, महिलांना दिलासा देण्याचे काम सरकारने केल्याचा दावा देखील अनेक मंत्र्यांनी केला.याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंट्टीवार आदिंनी भाषणे केली.

 

 

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक