Nashik: अरे देवा! महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 18:15 IST2025-06-14T18:11:41+5:302025-06-14T18:15:28+5:30

महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोराने चोरल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण, पतीनेच मंगळसूत्र चोरल्याची बातमी ऐकली का?

Nashik: Oh my God! The mangalsutra and mobile phone from the woman's neck were stolen by her husband. | Nashik: अरे देवा! महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले

Nashik: अरे देवा! महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले

Nashik Crime News: महिला भाजीपाला घेऊन घरी निघाली होती. त्याचवेळी तिच्याजवळ एक दुचाकी थांबली. दुचाकीवरील व्यक्ती महिलेच्या जवळ आला. तिला मारहाण केली आणि गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि मोबाईल घेऊन पसार झाला. हा व्यक्ती महिलेचा पतीच होता. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भाजीपाला घेऊन पायी चालत असताना पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र व मोबाईल घेऊन पतीने धूम ठोकली. हे दाम्पत्य गेल्या काही दिवसांपासून विभक्त राहत होते. 

पाथर्डी शिवारातील अहिल्यामाता नगर परिसरात ही घटना घडली. इंदिरानगर पोलिस ठाण्यात पत्नीने पतीविरुद्ध दिलेल्या तक्रारीनंतर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती आणि पत्नीमध्ये काय घडलं?

वैशाली पांडव (वय ३७) व त्यांचे पती संतोष पांडव (रा. सिडको) यांच्यात वाद झाल्याने ते विभक्त राहत होते. पत्नी व मुलांना मारहाण करून त्यांना धमकाविण्याचे काम संतोष हा करीत होता. 

वैशालीने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यान्वये तक्रार दाखल केली होती. बुधवारी (दि.११) वैशाली पांडव संध्याकाळी साडेआठ वाजता भाजीपाला आणण्यासाठी पाथर्डीगाव बाजारात गेल्या होत्या. 

आधी मारहाण, नंतर मंगळसूत्र घेऊन फरार

पायी चालत जात असताना अहिल्यामाता नगर येथील गल्लीत अचानक त्यांचे पती संतोष पांडव हे दुचाकीवरून आले. गाडीवरून उतरून वैशाली पांडव यांना चापटाने मारहाण करायला सुरुवात केली. मंगळसूत्र तसेच मोबाईल घेऊन तेथून धूम ठोकली.

Web Title: Nashik: Oh my God! The mangalsutra and mobile phone from the woman's neck were stolen by her husband.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.