शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

नाशिक विभागाचा निकाल 9.84 टक्यांनी घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 2:47 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा अर्थात दहावीचा निकाल शनिवारी (दि.८) जाहीर झाला असून यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत दहावीच्या निकालात तब्बल ९.८४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी ८६.४२ टक्के असलेल्या विभागाचा निकाल यावर्षी ७७.५८ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. शिक्षण मंडळाने प्रश्नपत्रिकांऐवजी कृतीपत्रीकांचा केलेला प्रयोग विद्यार्थ्यांच्या लक्ष न आल्याने निकाला एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचा निरीक्षण शैक्षणिक क्षेत्रातून वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देदहावीचा निकाल जाहीरनाशिक विभागाचा टक्का घसरलाविभागातील १७९ शाळांचा शंभर टक्के निकाल

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा अर्थात दहावीचा निकाल शनिवारी (दि.८) जाहीर झाला असून यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत दहावीच्या निकालात तब्बल ९.८४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी ८६.४२ टक्के असलेल्या विभागाचा निकाल यावर्षी ७७.५८ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. शिक्षण मंडळाने प्रश्नपत्रिकांऐवजी कृतीपत्रीकांचा केलेला प्रयोग विद्यार्थ्यांच्या लक्ष न आल्याने निकाला एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचा निरीक्षण शैक्षणिक क्षेत्रातून वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नाशिकसह, धुळे, नंदुरबार जळगाल या चारही जिल्ह्यांत  ११ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत प्रात्यक्षिक  तर १ ते २२ मार्च या कालवधीत ४३३ परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली होती.  विभागात मराठी , हिंदी, इंग्रजी, उर्दू, सिंधी, गुजराथी,कन्नड व तमीळ या आठ भाषांमध्ये घेण्यात आलेल्या पपरीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विभागातून परीक्षेला प्रविष्ठ एकूण १ लाख ९८ हजार ७५० विद्यार्थ्यांपैकी १ लाख ४१ हजार १९३ म्हणजे ७७.५८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  विभागातील तब्बल १७९ शाळाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. तर ४४५ शालांचा निकाल ९० टक्क्यांहून अधिक लागला आहे. यात प्रामुख्याने इंग्रजी विषयात विभागातील विद्यार्थ्यांची हुश्शारी दिसून आली असून प्रथम भाषा इंग्रजी विषयाचे सर्वाधिक ९६.३३ टक्के  विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्या खोलोखाल विज्ञान ९४.४८ द्वीतीय व तृतीय भाषा मराठी ९३.६२, गणित ९२.५७,  सामाजिक शास्त्र ९२. १२, मराठी प्रथम भाषा ७९.२६ , प्रथम भाषा हिंदी ८४.१८, इंग्रजी द्वतीय वतृतीय भाषा ८३.११, प्रथम भाषा उर्दू ८०.३ टक्के  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. दहावीच्या परीक्षा यावर्षी प्रथमच प्रश्नपत्रीकांऐवजी कृतीपत्रीकांच्या पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. त्यासाठी शिक्षकांचे विशेष प्रशिक्षणही घेण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांकडून सरावासाठी कृतीपत्रीका सोडवूनही घेण्यात आल्या होत्या. परंतु हा प्रयोग विद्यार्थ्यांच्या पूर्णपणे पचणी न पडल्याचे निकालाचा टक्का घसरल्याने दिसून येत आहे. 

यामुळे घसरला निकालाचा टक्का प्रश्नपत्रिके ऐवजी कृतीपत्रिकेची बदललेली परीक्षा आठवीपर्यंत परीक्षा नसल्याने अभ्यासाचा सराव नसणे फिरत्या पथकांची परीक्षेवर करडी नजरबैठे पथकांनी पेपर पूर्ण होईपर्यंत परीक्षेवर नजर ठेवली 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थीSchoolशाळा