शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

कांदा अनुदानासाठी आणखी पंधरा दिवस मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 19:21 IST

जिल्ह्यात यंदा उन्हाळ कांद्याचे भाव सप्टेंबर अखेरपासूनच घसरण्यास सुरुवात झाली. आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत कांदा अक्षरश: मातीमोल भावात शेतक-यांना विक्री करावा लागला. अनेक शेतक-यांना कांद्याच्या वाहतुकीचा खर्चदेखील निघाला नाही

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : ३१ डिसेंबरपर्यंत विक्रीची मुभा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कांदा दरात झालेली घसरण व त्यातून गावोगावी सरकारविरुद्ध शेतक-यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतक-यांना क्विंटलमागे दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेत त्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत कांदाविक्री केलेल्या शेतक-यांनाच पात्र ठरविले. परंतु आता त्या मुदतीत आणखी पंधरा दिवसांनी वाढ करण्यात आली असून, नवीन निर्णयानुसार ३१ डिसेंबरपर्यंत कांदाविक्री केलेल्या शेतक-यांनाही सरकारच्या या मदतीचा लाभ दिला जाणार आहे.

जिल्ह्यात यंदा उन्हाळ कांद्याचे भाव सप्टेंबर अखेरपासूनच घसरण्यास सुरुवात झाली. आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत कांदा अक्षरश: मातीमोल भावात शेतक-यांना विक्री करावा लागला. अनेक शेतक-यांना कांद्याच्या वाहतुकीचा खर्चदेखील निघाला नाही, तर अनेकांनी चाळीतच कांदा ठेवणे पसंत केले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांमध्ये सरकारविरुद्ध असंतोष निर्माण होऊन कांदा विक्रीचे पैसे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना मनिआॅर्डरने पाठवून राग शमविण्याचा प्रयत्न केला. गावोगावी रस्त्यावर कांदा ओतून आंदोलने होत असल्याने आगामी निवडणूक लक्षात घेता, सरकारने शेतकºयांना आपलेसे करण्यासाठी १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात कांदाविक्री केलेल्या शेतक-यांना क्विंटलमागे दोनशे रुपये अनुदान देण्याचा व दोनशे क्विंटलपर्यंत विक्री केलेल्या कांद्यालाच ते देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शेतक-यांकडून कांदा विक्रीच्या पावत्या, पीकपेरा, सातबारा उतारा व बॅँकेचे खाते क्रमांकाची माहिती सहकार विभागाला सादर करण्यासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे ७२ हजार शेतक-यांनी आपली माहिती सहकार विभागाला सादर केली असून, शेतक-यांनी सादर केलेल्या माहितीची छाननी केली जात असतानाच, गुरुवारी राज्य सरकारने पुन्हा शेतक-यांना दिलासा देण्यासाठी १५ डिसेंबरऐवजी ३१ डिसेंबरपर्यंत कांदाविक्री केलेल्या शेतक-यांनाही अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. १५ डिसेंबरनंतर कांदाविक्री केलेल्या शेतक-यांनाही आता याचा लाभ मिळणार आहे.

चौकट===सरकारने मुदतवाढ दिली असली तरी, १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात पंधरा दिवस जिल्ह्यातील बाजार समित्या दिवाळी सणामुळे बंद होत्या. त्यामुळे शेतक-यांसाठी कांदा विक्रीसाठी कमी कालावधी मिळाला. मुळात आॅक्टोबर महिन्यापासून सुरू झालेली कांदा घसरण जानेवारीपर्यंत कायम असून, सरकारचा विशिष्ट कालावधीसाठी अनुदान देण्याचा निर्णय म्हणजे शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार आहे.- राजेंद्र डोखळे, शेतकरी नेते

टॅग्स :onionकांदाNashikनाशिकagricultureशेती