शहरं
Join us  
Trending Stories
1
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
2
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
3
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
4
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
5
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
6
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
7
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
8
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
9
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
10
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
11
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
12
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
13
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
14
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
15
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
16
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
17
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
18
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
19
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
20
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
Daily Top 2Weekly Top 5

मराठी शाळा बंद करण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 06:25 IST

शाळा अनुदानासाठी पात्र घोषित झाली म्हणजे त्या शाळेस अनुदानाचा हक्क प्राप्त झाला असे होत नाही असा बदल करून शिक्षण विभागाला नेमके काय सुचवायचे आहे

मुंबई : शाळा अनुदानासाठी पात्र घोषित झाली म्हणजे त्या शाळेस अनुदानाचा हक्क प्राप्त झाला असे होत नाही असा बदल करून शिक्षण विभागाला नेमके काय सुचवायचे आहे, असा सवाल मुख्याध्यापक संघटनेकडून करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांच्या मूल्यांकनासाठीच्या निकषांमध्ये बदल करण्याचा नवीन शासन निर्णय जारी केला असून त्यावर शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या माध्यमातून मराठी शाळा बंद करण्याचा शासनाचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आधीच शासनाने मराठी तसेच प्रादेशिक भाषेतील शाळांना अनुदान मिळू नये, म्हणून जाचक अटी लादल्या आहेत. भाजपा सत्तेवर आल्यानंतर मूल्यांकनात घोषित केलेल्या शाळांची पुनर्तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता अनुदानास पात्र ठरल्यानंतर पुन्हा त्या शाळांची पुनर्तपासणी कशासाठी, असा सवाल संघटना आणि शिक्षकांकडून होत आहे. थोडक्यात या शाळांना आयुष्यभर अनुदान मिळू नये व या शाळा संस्थेने, शिक्षकांनी कंटाळून बंद कराव्यात, हाच विचार शासनाचा असल्याचा आरोप मुख्याध्यापक संघटनेकडून करण्यात आला.