शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

मनमाडकरांना पालखेडच्या पाण्याच्या आवर्तनाची ‘प्रतीक्षा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:34 AM

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाण्याची तहान भागविण्यासाठी मनमाडकरांना आता पालखेडच्या पाण्याची रोटेशनची प्रतीक्षा असून, प्रशासनाने याबाबत तत्काळ कार्यवाही करावी,

मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातीलपाणीसाठा संपुष्टात आल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाण्याची तहान भागविण्यासाठी मनमाडकरांना आता पालखेडच्या पाण्याची रोटेशनची प्रतीक्षा असून, प्रशासनाने याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.तीव्र पाणीटंचाईमध्ये पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळील मुख्य जलकुंभाच्या पाइपमधून होणाºया गळतीमुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत असताना पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. पाणीटंचाई पाचवीला पूजलेल्या मनमाड शहरात पाण्याअभावी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा शहर व परिसरात दमदार पाऊस न झाल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली असून, नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यावर्षी वरुणराजा परिसरावर रुसलेलाच राहिला. शहराला पाणीपुरवठा करणाºया वागदर्डी धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने यावर्षी धरणात पाणी आलेच नाही. संपूर्ण वर्षभर मनमाडकरांची तहान पालखेडच्या रोटेशनने भागविली. दुष्काळी परिस्थितीमुळे परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांच्या खासगी विंधनविहिरींनी केव्हाच राम म्हटले आहे.पाण्याच्या उपलब्धतेअभावी पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये वाढ होत जाऊन तो कालावधी आज २३ दिवसांच्या वर जाऊन पोहोचलाआहे. सध्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याने पुढील उपाययोजनान केल्यास पाण्यासाठी हतबल होण्याची वेळ मनमाडकरांवर ओढावणार आहे. या परिस्थितीकडे लोकप्रतिनिधींसह पालिका प्रशासनसुद्धा गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.पालखेडच्या रोटेशन मिळण्यास विलंब झाल्यास शहरावर मोठे जलसंकट ओढावणार आहे. पालखेडचे रोटेशन लवकरात  लवकर सोडण्यात यावे यासाठी पालिका प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.जलकुंभाच्या पाइपमधून पाण्याची गळतीमनमाड शहरात पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे. महिला वर्ग हंडाभर पाण्यासाठी दारोदार फिरत असल्याचे चित्र पहावयास मिळते. इतकी भीषण परिस्थिती असताना वागदर्डी धरणालगत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात उभारण्यात आलेल्या जलकुंभाच्या पाइपमधून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. या जलकुंभातून शहरातील जलकुंभांना पाणीपुरवठा करण्यात येत असतो. तसेच जलशुद्धीकरण केंद्राला खेटून असलेल्या व्हॉल्व्हमधून पण मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने पाणी वाया जाते. भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये पाण्याच्या होणाºया अपव्ययाबाबत पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीDamधरण