शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

४५० जणांना मालेगावी नोटिसा

By admin | Updated: February 1, 2016 22:10 IST

४५० जणांना मालेगावी नोटिसा

मालेगाव : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढविणाऱ्या इच्छुकांपैकी निवडणूक खर्च सादर न केलेल्या सुमारे साडेचारशे जणांना जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी राजकारण बंदी का करण्यात येऊ नये? अशा आशयाच्या नोटिसा काढल्याने खळबळ उडाली आहे. यात १०० ते १५० विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. तालुक्यात झालेल्या १२० ते १२५ गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्याच्या सरपंच पदासाठी चार ते पाच टप्प्यात निवडणूक कार्यक्रम राबविण्यात आला होता. या निवडणूक रिंगणात असलेल्या ४८२ जणांनी आपला निवडणूक खर्च सादर केला नाही. त्यामुळे या सर्वांना जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने आपल्याला पाच वर्ष निवडणूक लढविण्याची बंदी का आणू नये? तसेच आपल विद्यमान सदस्यत्व का रद्द करू नये? या आशयाच्या नोटिसा काढल्या असल्याची माहिती तहसील कार्यालयातून मिळाली आहे. या नोटिसा काढलेल्यांच्या यादीत सुमारे १५० विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. यामुळे ग्रामीण भागातील राजकारणात मोठी उलथापालथ माजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात काहींना आसुरी आनंद झाला असून, काहींनी विद्यमानांचे सदस्य रद्द होऊन नवीन निवडणुका होतील या आशेने निवडणुकीसाठी आपल्या बाह्या वाळण्यास सुरुवात केली आहे. या पूर्वीही जिल्हाधिकाऱ्यांनी पहिल्या टप्प्यात काहींना अशा आशयाच्या नोटिसा काढल्या होत्या. (प्रतिनिधी)