शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Maharashtra Election 2019 : भुजबळांना सहानुभूती मिळणार की महायुती परिवर्तन घडविणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 04:10 IST

गेल्या तीन टर्ममध्ये सहज वाटणारी निवडणूक यंदा त्यांना तितकीशी सोपी राहिलेली नाही.

धनंजय वाखारेनाशिक - जिल्ह्यातील येवला मतदारसंघात सलग चौथ्यांदा उमेदवारी करणारे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर पुन्हा एकदा शिवसेनेचे संभाजी पवार यांचे आव्हान आहे. निवडणूक रिंगणात एकूण ८ उमेदवार असले तरी खरी लढत भुजबळ-पवार यांच्यातच रंगणार आहे.

भुजबळ यांनी आपल्या कामाच्या झपाट्याने गेल्या १५ वर्षांत मतदारसंघावर मांड घट्ट केलेली असल्याने यंदाही त्यांची नौका विधानभवनाच्या किनाऱ्याला लागेल, असे चित्र दिसत असले तरी, अधून-मधून डोकावणारे विरोधाचे खडक त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकतात. त्यामुळेच गेल्या तीन टर्ममध्ये सहज वाटणारी निवडणूक यंदा त्यांना तितकीशी सोपी राहिलेली नाही.

येवला नगरपालिकेवर भाजपचा नगराध्यक्ष आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर सेनेचे वर्चस्व असले तरी आत्मकेंद्रित राजकारणामुळे युतीतील नेत्यांमध्ये फारसे सख्य नाही. शिवाय, ईडीमुळे तुंरुगवास भोगावा लागल्यामुळे त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न भुजबळ समर्थकांकडून होत आहे. सरकारने सुडबुद्धीने कारवाई केली, असा त्यांचा आरोप आहे.जमेच्या बाजू

छगन भुजबळ - सलग तीन टर्म नेतृत्व करताना छगन भुजबळ यांनी मतदारसंघाला विकासाची दाखविलेली दिशा. नेहमीच दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यात पुणेगाव-दरसवाडी योजनेद्वारे पाणी कातरणी परिसरापर्यंत आणून ठेवल्याने सुमारे ४० खेड्यांना मिळालेला दिलासा. पैठणी क्लस्टर, तात्या टोपे स्मारक, मुक्तिभूमी स्मारक यापासून ते क्रीडासंकुलापर्यंत निर्माण केलेली स्थायी स्वरूपाची कामे.

संभाजी पवार - मागील निवडणुकीतही शिवसेनेकडून उमेदवारी करताना दुसऱ्या क्रमांकाची सुमारे ३४ टक्के घेतलेली मते. संघटन कौशल्यामुळे कार्यकर्त्यांचे आवतीभवती असणारे मोहोळ. पंचायत समिती, मजूर फेडरेशन आणि स्वत:च्या शैक्षणिक संस्थेचे जिल्हाभर पसरलेले जाळे यामुळे जनमानसाला परिचित असलेला चेहरा. चुलते माजी आमदार मारोतराव पवार यांचा लाभलेला राजकीय वारसा. विविध कामांसाठी वैयक्तिक पुढाकार.उणे बाजू

छगन भुजबळ - आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदी कार्यरत असताना दाखविलेली विकासाची गती गेल्या पाच वर्षांत मंदावली. त्यामुळे काही प्रमाणात नाराजीचा सूर. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात २६ महिने तुरुंगवारीमुळे जनमानसात निर्माण झालेले संशयाचे मळभ. गेल्या पाच वर्षांत कमी झालेला लोकसंपर्क. जवळचे म्हणविले जाणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला दुरावा. निवडणूकपूर्व पक्षांतराच्या चर्चांमुळे पक्षनिष्ठेबाबत कार्यकर्त्यांमध्ये असलेला संशयकल्लोळ.

संभाजी पवार - प्रभावी कार्यकर्ता म्हणून ओळख असली तरी वक्तृत्वशैलीचा अभाव. मागील निवडणुकीत पराभूत होऊनही यंदा पुन्हा शिवसेनेने उमेदवारी पदरात टाकल्याने पक्षांतर्गत इच्छुकांमध्ये उमटलेला नाराजीचा सूर. या सुप्त विरोधामुळे त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता. शिवसेनेच्याच स्थानिक दोघा (विधान परिषदेतील) आमदारांचे कितपत सहकार्य मिळेल याबाबत साशंकता. भुजबळांबाबत ज्येष्ठ शिवसैनिकांमध्येही असलेली सहानुभूती.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Chhagan Bhujbalछगन भुजबळ