शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

आरक्षणाच्या मुद्द्यावर वंचित आघाडी मैदानात; नाशिक जिल्ह्यात १० मतदारसंघांत उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2024 08:22 IST

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने याच मुद्यावर वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

नाशिक: राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने याच मुद्यावर वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. आरक्षणाचा फॉर्म्युला वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडेच असल्याचा दावा करीत वंचितने जिल्ह्यातील दहा मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत.

नाशिक शहरातील देवळाली, नाशिक पूर्व, नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम या चारही मतदारसंघात वंचितचे उमेदवार आहेत. देवळालील अविनाश शिंदे, नाशिक पूर्व मध्ये रवींद्र कुमार पगारे, नाशिक मध्य मध्ये मुशीर सय्यद आणि नाशिक पश्चिम मध्ये अमोल चंद्रमोरे असे उमेदवार मैदानात आहेत. चांदवड मतदारसंघात संतोष केदारे, दिंडोरीत प्रा. योगेश भुसार, नांदगावला आनंद शिंगारे, इगतपुरीत भाऊसाहबे डगळे, बागलाणमध्ये राजेंद्र चौरे, तर मालेगाव बाह्य मतदारसंघात किरण मगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

नाशिक मध्य या मतदारसंघात काँग्रेसमधून वंचितकडे आलेले मुशीर सय्यद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचितच्या उमेदवारांना मिळणाऱ्या मतांचा थेट परिणाम महाविकास आघाडी आणि महायुती उमेदवारांच्या मतांच्या गणितावर होत असल्याचा आरोप दरवेळी केला जातो त्यामळे यंदादेखील वंचितच्या उमेदवारांचा फटका इतर पक्षांच्या उमेदवारांना बसणार का? याबाबतची चाचपणी युती आणि आघाडीच्या उमेदवारांकडून केली जात आहे. वंचितने दहा ठिकाणी उमेदवार उभे केले असून वंचितकडे आरक्षणाचा मुद्दा असल्याने त्यांना कितपत यश मिळेल, हे येत्या २३ तारखेलाच कळणार आहे.

बच्चू कडूंच्या प्रहारचे तीन उमेदवार

परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्ह्यात तीन जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. पाच जागांवर चाचपणी केल्यानंतर निफाड, चांदवड आणि बागलाण मतदारसंघात उमेदवार उतरविण्यात आले. शेतकरी, दिव्यांग आणि शिक्षणाच्या मुद्यावर बच्चू कडू यांनी आपले उमेदवार रिंगणात उतरविले असून निफाडमधून आमदार सुहास कांदे यांचे बंधू गुरुदेव कांदे प्रहारकडून लढत आहेत. चांदवड मतदारसंघातून गणेश निंबाळकर, तर बागलाण मतदारसंघातून जयश्री गरुड या प्रहारच्या उमेदवार आहेत. मागील निवडणुकीत प्रहारकडून एकही जागा जिल्ह्यात लढविण्यात आलेली नव्हती. यंदा परिवर्तन महाशक्ती संघटनेच्या माध्यमातून प्रहारने तीन उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी बच्चू कडू जिल्ह्यात सभा घेणार आहेत.

शेतकऱ्यांचे प्रश्न, अनुदानाचा मुद्या, शिक्षणाची अवस्था, दिव्यांगाच्या सुविधा अशा मुद्यांवर निवडणूक लढवीत आहे. यंदा प्रथमच तीन उमेवार जिल्ह्यातून देण्यात आलेले आहेत. दिव्यांगांचा निधी, आणि लाडकी बहीण योजनेतून महिलांना आर्थिक लाभ दिला; मात्र तेलाचे दर वाढवून काढूनही घेतले हा मुद्दा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचणार आहोत. - अनिल भडांगे, जिल्हाध्यक्ष, प्रहार संघटना.

केवळ मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी नव्हे, तर यंदा आरक्षणाचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. आरक्षणाचा फॉर्म्युला आमचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडेच असून, आरक्षणवादी जनतेचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी आम्ही निवडणूक रिंगणात आहोत. आरक्षण आणि संविधान बचावाची आमची मोहीम आहे. - चेतन गांगुर्डे, राज्य सदस्य, वंचित बहुजन आघाडी 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरnorth maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकNashikनाशिक