शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

आरक्षणाच्या मुद्द्यावर वंचित आघाडी मैदानात; नाशिक जिल्ह्यात १० मतदारसंघांत उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2024 08:22 IST

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने याच मुद्यावर वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

नाशिक: राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने याच मुद्यावर वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. आरक्षणाचा फॉर्म्युला वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडेच असल्याचा दावा करीत वंचितने जिल्ह्यातील दहा मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत.

नाशिक शहरातील देवळाली, नाशिक पूर्व, नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम या चारही मतदारसंघात वंचितचे उमेदवार आहेत. देवळालील अविनाश शिंदे, नाशिक पूर्व मध्ये रवींद्र कुमार पगारे, नाशिक मध्य मध्ये मुशीर सय्यद आणि नाशिक पश्चिम मध्ये अमोल चंद्रमोरे असे उमेदवार मैदानात आहेत. चांदवड मतदारसंघात संतोष केदारे, दिंडोरीत प्रा. योगेश भुसार, नांदगावला आनंद शिंगारे, इगतपुरीत भाऊसाहबे डगळे, बागलाणमध्ये राजेंद्र चौरे, तर मालेगाव बाह्य मतदारसंघात किरण मगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

नाशिक मध्य या मतदारसंघात काँग्रेसमधून वंचितकडे आलेले मुशीर सय्यद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचितच्या उमेदवारांना मिळणाऱ्या मतांचा थेट परिणाम महाविकास आघाडी आणि महायुती उमेदवारांच्या मतांच्या गणितावर होत असल्याचा आरोप दरवेळी केला जातो त्यामळे यंदादेखील वंचितच्या उमेदवारांचा फटका इतर पक्षांच्या उमेदवारांना बसणार का? याबाबतची चाचपणी युती आणि आघाडीच्या उमेदवारांकडून केली जात आहे. वंचितने दहा ठिकाणी उमेदवार उभे केले असून वंचितकडे आरक्षणाचा मुद्दा असल्याने त्यांना कितपत यश मिळेल, हे येत्या २३ तारखेलाच कळणार आहे.

बच्चू कडूंच्या प्रहारचे तीन उमेदवार

परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्ह्यात तीन जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. पाच जागांवर चाचपणी केल्यानंतर निफाड, चांदवड आणि बागलाण मतदारसंघात उमेदवार उतरविण्यात आले. शेतकरी, दिव्यांग आणि शिक्षणाच्या मुद्यावर बच्चू कडू यांनी आपले उमेदवार रिंगणात उतरविले असून निफाडमधून आमदार सुहास कांदे यांचे बंधू गुरुदेव कांदे प्रहारकडून लढत आहेत. चांदवड मतदारसंघातून गणेश निंबाळकर, तर बागलाण मतदारसंघातून जयश्री गरुड या प्रहारच्या उमेदवार आहेत. मागील निवडणुकीत प्रहारकडून एकही जागा जिल्ह्यात लढविण्यात आलेली नव्हती. यंदा परिवर्तन महाशक्ती संघटनेच्या माध्यमातून प्रहारने तीन उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी बच्चू कडू जिल्ह्यात सभा घेणार आहेत.

शेतकऱ्यांचे प्रश्न, अनुदानाचा मुद्या, शिक्षणाची अवस्था, दिव्यांगाच्या सुविधा अशा मुद्यांवर निवडणूक लढवीत आहे. यंदा प्रथमच तीन उमेवार जिल्ह्यातून देण्यात आलेले आहेत. दिव्यांगांचा निधी, आणि लाडकी बहीण योजनेतून महिलांना आर्थिक लाभ दिला; मात्र तेलाचे दर वाढवून काढूनही घेतले हा मुद्दा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचणार आहोत. - अनिल भडांगे, जिल्हाध्यक्ष, प्रहार संघटना.

केवळ मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी नव्हे, तर यंदा आरक्षणाचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. आरक्षणाचा फॉर्म्युला आमचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडेच असून, आरक्षणवादी जनतेचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी आम्ही निवडणूक रिंगणात आहोत. आरक्षण आणि संविधान बचावाची आमची मोहीम आहे. - चेतन गांगुर्डे, राज्य सदस्य, वंचित बहुजन आघाडी 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरnorth maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकNashikनाशिक