शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी ऐक्य परिषद

By admin | Updated: January 1, 2017 23:25 IST

मान्यवरांचे मत : जातीय सलोखा काळाची गरज

लासलगाव : येथे जनजागरण समितीतर्फे जातीय सलोखा राखण्यासाठी रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली रिपाइं जातीय सलोखा ऐक्य परिषद संपन्न झाली. याप्रसंगी माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी मनोगतातून जातीय सलोखा ही काळाची गरज असल्याचे नमूद केले . बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी राज्यभर निघत असलेल्या विविध समाजांच्या मोर्चांवर बोलताना दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येक समाजातील तरुणांनी घेतली पाहिजे, असे आवाहन केले. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दायमा यांनी माणुसकीचा धर्मच सर्वात श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन केले. रवींद्र जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मोर्चाच्या निमित्ताने कोणत्याही एका समाजाला टार्गेट करू नये, असे सांगितले. या परिषदेचे संयोजन लासलगाव रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामनाथ शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.  या वेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद जाधव, राजाभाऊ आहिरे, लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, संजय कासट, पंकज पारख,गुणवंत होळकर, रवि होळकर, सतीश पवार, मोसीन पठाण, डॉ. अमोल शेजवळ, प्रा. बगाडे, महेश बाफना, फिरोज मोमीन, संजय गायकवाड, अर्चना दरगुडे, सागर अहिरे, सोनू शेजवळ, कैलास केदारे, सर्जेराव वाघ आदि उपस्थित होते.