शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कमी झोपेमुळे अनेकांच्या रोगप्रतिकारक शक्तीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:19 IST

नाशिक : प्रत्येकाच्या आयुष्यातील धावपळ, ताणतणाव, चिंता, वाढलेला स्क्रीनटाइम यासह विविध कारणांमुळे अनेक नागरिकांच्या झोपेच्या वेळेत घट झाली आहे. ...

नाशिक : प्रत्येकाच्या आयुष्यातील धावपळ, ताणतणाव, चिंता, वाढलेला स्क्रीनटाइम यासह विविध कारणांमुळे अनेक नागरिकांच्या झोपेच्या वेळेत घट झाली आहे. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर उशिरा झोपण्याच्या सवयीने अनेक नागरिकांच्या रोगप्रतिकारक शक्तीत घट झाल्याने सातत्याने आजारपण येण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.

मोबाइल, लॅपटॉपवर मध्यरात्रीनंतरही उशिरापर्यंत बसणे, चॅट करणे, गेम खेळणे यासारख्या काही वाईट आणि अयोग्य सवयींचा नकारात्मक परिणाम हा रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. दिवसभर मोबाइल किंवा कॉम्प्युटरवर काम करणे, गेम खेळणे, सोशल मीडियावर सतत ॲक्टिव्ह राहणे जे पूर्णत: चुकीचे आहे. शारीरिकरीत्या सक्रिय न राहिल्यानेदेखील रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊ लागते. त्यामुळे अनेकांना गंभीर आजार विळखा घालू लागतात. सकाळी उशिरा उठणं, रात्रभर कॉम्प्युटर किंवा मोबाइलवर गेम खेळणं, उशिरापर्यंत टीव्ही पाहणं यामुळे अनेक जण रात्री उशिरा झोपतात. झोपेच्या कमतरतेमुळे स्ट्रेस म्हणजेच ताणतणाव वाढतो आणि यामुळे मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्याच्या क्रियेत बाधा येते. यामुळे अनेक माणसांना दररोजच अशक्तपणा वाटण्यासह रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते.

इन्फो

किमान ७ तास झोप आवश्यक

झोपेचा अभाव शरीराच्या सर्व यंत्रणेवर नकारात्मक परिणाम करतो आणि बहुतांश गंभीर रोगांचे कारण ठरतो. त्यामुळे निर्धारित ७ ते ९ तासांपेक्षा कमी झोपणे हे अनेक समस्यांचे मूळ असते. त्यामुळे पुरेशी झोप घेणे अत्यावश्यकच असते, हे प्रत्येकाने लक्षात ठेवून तसे वागण्याची गरज आहे.

इन्फो

संतुलित आहार आणि व्यायाम आवश्यक

रोगप्रतिकारक शक्ती ही काही प्रमाणात संतुलित आहार आणि व्यायामावर अवलंबून असते. संतुलित, पौष्टिक आणि सकस आहारामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. नियमित प्रिजर्वेटिव्स आणि शुगर असणाऱ्या पदार्थांच्या अतिरिक्त सेवनाचा परिणाम पचनक्रियेवर होतो. ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊ लागते. त्यामुळे ताजा, पौष्टिक, सात्त्विक आहार घेणे आवश्यक असते. तसेच नियमित किमान एक वेळ व्यायाम आवश्यक असतो. वयोमानानुसार शरीराला झेपेल इतका व्यायाम करणे अत्यावश्यक आहे.

इन्फो

रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराची ढाल

आपण आपल्या आयुष्यातील एक तृतीयांश काळ झोपेत घालवतो. झोप ही शरीरातील पुनर्प्राप्तीची नियमित प्रक्रिया आहे. निरोगी आणि योग्य झोप ही यशस्वी दिवसाची आणि चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली असते. कारण हीच रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराची ढाल असते.

इन्फो

अपुऱ्या झोपेचे तोटे

अपुऱ्या झोपेमुळे कुणालाही दिवसभर उत्साह वाटत नाही. शरीर सतत जड असल्यासारखे वाटल्याने कामात तत्परता दाखवता येत नाही. तसेच एकूणातच चैतन्याचा अभाव वाटण्याने कोणतेही काम नीटपणे होत नाही. झोप अपुरी झाल्याने काहींना आळस येऊन दिवसभर जांभया येणे, चिडचिड होणे, जळजळ होणे, डोळ्यांना त्रास होणे यासह विविध प्रकारचे त्रास संभवतात.