शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

मजूर-शेतकऱ्यांमधील वादाने शेतीकामावर विपरीत परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:47 IST

गिरणारे, धोंडेगाव परिसरातील शेतकरी व शेतमजूर यांनी एकमेकांच्या विरोधात पुकारलेल्या असहकाराचा फटका दोन्ही बाजूकडील शेतकरी व शेतमजुरांना होत असून, त्याचा परिणाम शेतीकामांवर होत असल्याचे पाहून गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्या प्रयत्नामुळे मजूरवर्ग शेतीच्या कामाला वाळू लागला आहे.

गंगापूर : गिरणारे, धोंडेगाव परिसरातील शेतकरी व शेतमजूर यांनी एकमेकांच्या विरोधात पुकारलेल्या असहकाराचा फटका दोन्ही बाजूकडील शेतकरी व शेतमजुरांना होत असून, त्याचा परिणाम शेतीकामांवर होत असल्याचे पाहून गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्या प्रयत्नामुळे मजूरवर्ग शेतीच्या कामाला वाळू लागला आहे. परंतु त्याला मिळत असलेला प्रतिसाद व दोन्ही बाजूंकडून घेतली जाणाºया ताठर भूमिकेमुळे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी स्वत:च गावोगावी जाऊन मजूर व शेतकºयांच्या मनातील गैरसमज, भीती दूर करणार आहेत.गिरणारे परिसरातील शेतकरी व धोंडेगावाकडून येणाºया एका शेतमजूर व शेतकरीमध्ये किरकोळ वाद होऊन त्याचे पर्यावसान मारहाणीत झाल्याने चिडलेल्या शेतमजुराने ही घटना आपल्या सहकाºयांना सांगून त्याचे रूपांतर वादात झाले होते. मात्र पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी, सरपंच, दोन्ही बाजूकडील ग्रामस्थ, तहसीलदार यांच्या मध्यस्थीने सर्ववातावरण शांत होत असताना काही समाजकंटक त्याला वेगळे वळण लावण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना व वेगवेगळ्या मार्गाने वाद वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे जाणून खुद्द तहसीलदार व त्यांच्या पथकाने सकाळी पहाटे ५ वाजता त्या भागाचा दौरा करून त्यांची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. गिरणारे पंचक्रोशीतील शेतमजूर व शेतकºयांनी आपसातील मतभेद विसरून पुन्हा कामाला लागणे गरजेचे आहे. मजुरांच्या असहकारामुळे शेतकºयांनी आपल्या घरातील सर्व मंडळींना कामावर लावून शेतातली कामे करून घेण्यास सुरुवात केली आहे. अजूनही मजुराच्या मनातील भीती गेली नसल्याने लवकरच जिल्हा प्रशासनाच्या वतीने मजुरांच्या गावो गावी जाऊन त्यांची समजूत घातली जाणार असल्याचे नाशिकचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी सांगितले.शेतक-यांचे नुकसान टळलेविशेष करून टमाट्याचे खूड करून होणारे नुकसान टाळले आहे. ज्या शेतकºयाकडे बागाईत क्षेत्र जास्त त्याने पर्यायी व्यवस्था म्हणून शहरातील इतर भागातून मजूर आणून आपले काम उरकते केले आहे, तर दुसºया बाजूला काही मजुरांकडे घरची शेती असल्याने त्यांनी वातावरण शांत होईपर्यंत काम सुरू केले आहे. त्यामुळे पूर्वी गाड्या भरून येणाºया मजूर आता एकटे दुकटे एसटी बस अथवा दुचाकीने शेतक-याकडे कामाला येत आहेत.धोंडेगावच्या झालेल्या बैठकीत मजुरांनी दोन दिवसांनंतर कामावर येण्यास सांगितले होते मात्र दोन दिवस होऊनही मजूर कामावर आले नाही त्यामुळे आता गावोगावी जाऊन मजुरांना कामावर येण्याचे आवाहन करणार आहे.- शिवकुमार आवळकंठे, तहसीलदार

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपNashikनाशिक