शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मजूर-शेतकऱ्यांमधील वादाने शेतीकामावर विपरीत परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:47 IST

गिरणारे, धोंडेगाव परिसरातील शेतकरी व शेतमजूर यांनी एकमेकांच्या विरोधात पुकारलेल्या असहकाराचा फटका दोन्ही बाजूकडील शेतकरी व शेतमजुरांना होत असून, त्याचा परिणाम शेतीकामांवर होत असल्याचे पाहून गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्या प्रयत्नामुळे मजूरवर्ग शेतीच्या कामाला वाळू लागला आहे.

गंगापूर : गिरणारे, धोंडेगाव परिसरातील शेतकरी व शेतमजूर यांनी एकमेकांच्या विरोधात पुकारलेल्या असहकाराचा फटका दोन्ही बाजूकडील शेतकरी व शेतमजुरांना होत असून, त्याचा परिणाम शेतीकामांवर होत असल्याचे पाहून गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्या प्रयत्नामुळे मजूरवर्ग शेतीच्या कामाला वाळू लागला आहे. परंतु त्याला मिळत असलेला प्रतिसाद व दोन्ही बाजूंकडून घेतली जाणाºया ताठर भूमिकेमुळे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी स्वत:च गावोगावी जाऊन मजूर व शेतकºयांच्या मनातील गैरसमज, भीती दूर करणार आहेत.गिरणारे परिसरातील शेतकरी व धोंडेगावाकडून येणाºया एका शेतमजूर व शेतकरीमध्ये किरकोळ वाद होऊन त्याचे पर्यावसान मारहाणीत झाल्याने चिडलेल्या शेतमजुराने ही घटना आपल्या सहकाºयांना सांगून त्याचे रूपांतर वादात झाले होते. मात्र पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी, सरपंच, दोन्ही बाजूकडील ग्रामस्थ, तहसीलदार यांच्या मध्यस्थीने सर्ववातावरण शांत होत असताना काही समाजकंटक त्याला वेगळे वळण लावण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना व वेगवेगळ्या मार्गाने वाद वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे जाणून खुद्द तहसीलदार व त्यांच्या पथकाने सकाळी पहाटे ५ वाजता त्या भागाचा दौरा करून त्यांची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. गिरणारे पंचक्रोशीतील शेतमजूर व शेतकºयांनी आपसातील मतभेद विसरून पुन्हा कामाला लागणे गरजेचे आहे. मजुरांच्या असहकारामुळे शेतकºयांनी आपल्या घरातील सर्व मंडळींना कामावर लावून शेतातली कामे करून घेण्यास सुरुवात केली आहे. अजूनही मजुराच्या मनातील भीती गेली नसल्याने लवकरच जिल्हा प्रशासनाच्या वतीने मजुरांच्या गावो गावी जाऊन त्यांची समजूत घातली जाणार असल्याचे नाशिकचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी सांगितले.शेतक-यांचे नुकसान टळलेविशेष करून टमाट्याचे खूड करून होणारे नुकसान टाळले आहे. ज्या शेतकºयाकडे बागाईत क्षेत्र जास्त त्याने पर्यायी व्यवस्था म्हणून शहरातील इतर भागातून मजूर आणून आपले काम उरकते केले आहे, तर दुसºया बाजूला काही मजुरांकडे घरची शेती असल्याने त्यांनी वातावरण शांत होईपर्यंत काम सुरू केले आहे. त्यामुळे पूर्वी गाड्या भरून येणाºया मजूर आता एकटे दुकटे एसटी बस अथवा दुचाकीने शेतक-याकडे कामाला येत आहेत.धोंडेगावच्या झालेल्या बैठकीत मजुरांनी दोन दिवसांनंतर कामावर येण्यास सांगितले होते मात्र दोन दिवस होऊनही मजूर कामावर आले नाही त्यामुळे आता गावोगावी जाऊन मजुरांना कामावर येण्याचे आवाहन करणार आहे.- शिवकुमार आवळकंठे, तहसीलदार

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपNashikनाशिक