शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 23:44 IST

नांदगाव : इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.

ठळक मुद्देनांदगाव : काशीनाथ बाबांवर युवा फाउंडेशनकडून क्रियाकर्म

नांदगाव : इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.काशीनाथ शिंदे (वय वर्षे ७०, मूळ रा. वागण, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) यांचे नांदगावच्या लेंडी नदी किनाऱ्याजवळ ढवळे बिल्डिंग परिसरात त्यांचे वास्तव्य होते. शारीरिक व्याधींमुळे अधू असलेल्या बाबांना रस्त्यावरील नागरिक येता-जाता जेवण, नाश्ता द्यायचे. रात्री भिंतीच्या किंवा झाडाच्या आडोशाला बाबा झोपत असे. वाढलेली दाढी, शून्यात नजर आणि अंगभर चिंध्या झालेले कपडे, झोपायला रस्त्यालगतचा खड्डा अशा अवस्थेतले बाबाचे जिणे काही वर्षांपासून नांदगावकरांना माहिती झाले होते. ते उपाशी राहणार नाहीत एवढी काळजी घेतली जात असे; पण काही दिवसांपूर्वी काशीनाथ बाबांनी त्याच जागी अखेरचा श्वास घेतला. येथील युवा फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी या बाबांचे अंतिम क्रियाकर्म पार पाडत सामाजिक सेवेचा आदर्श घालून दिला.गेल्या काही वर्षांत सणासुदीला, दसरा, दिवाळीला शहरातील नागरिकांना काशीनाथ बाबांची आठवण होत असे. फराळ, कपडेलत्ते आपापल्या पद्धतीने अनेक जण त्यांना मदत करीत असत. आलेली मदत त्यांनी कधी नाकारली नाही; पण कोणी अधिकच चौकशी करू लागले तर त्यांना तर्कटलेल्या स्वरात उत्तर मिळायचे. म्हणून त्यांच्या पूर्वेतिहासाची निश्चित माहिती कोणालाच नव्हती. झाडाखालची जागा सोडून इतरत्र जाताना त्यांना कोणीही पाहिले नव्हते. जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा सेवा करण्याची संधी येथील युवा फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी केली. त्यांना अखेरचा निरोप देण्याची सेवाही फाउंडेशनच्या सुमित सोनवणे, प्रसाद वडनेरे, नीलेश पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे राम शिंदे यांच्या माध्यमातून घडली. नांदगाव पोलीस स्टेशनचे नाईक राकेश चौधरी, पोलीस शिपाई अमोल शिंदे यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकNashikनाशिक