शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

संस्कृत भाषेला जिवंत ठेवण्याची जबाबदारी भारतीयांचीच! : विनय सहस्त्रबुद्धे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 01:25 IST

संस्कृतमुळे भारतीय संस्कृती देश-विदेशात पोहोचली आहे. भारतीय संस्कृतीची पाळेमुळे संस्कृत भाषेत रुजली आहेत. त्यामुळे संस्कृत भाषेला जिवंत ठेवण्याची जबाबदारी भारतीयांचीच आहे. इंंग्रजी संभाषणाप्रमाणे संस्कृत संभाषणाला प्रतिष्ठा मिळाल्यास, तसेच संंस्कृत ठरावीक लोकांपुरती मर्यादित न राहता, प्रचार-प्रसारासाठी सर्वांगीण प्रयत्न केले, तर संस्कृत भाषेलाही नवसंंजीवनी मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राज्यसभेचे खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केला. संस्कृत भाषा सभेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात रमेश देशमुख आणि सरिता देशमुख यांना संस्कृत भाषा संवर्धनासाठीचा या वर्षीचा पहिला कै.डॉ.वि.म. गोगटे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देसंस्कृत भाषा सभा संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात देशमुख दाम्पत्याला पुरस्कार

नाशिक : संस्कृतमुळे भारतीय संस्कृती देश-विदेशात पोहोचली आहे. भारतीय संस्कृतीची पाळेमुळे संस्कृत भाषेत रुजली आहेत. त्यामुळे संस्कृत भाषेला जिवंत ठेवण्याची जबाबदारी भारतीयांचीच आहे. इंंग्रजी संभाषणाप्रमाणे संस्कृत संभाषणाला प्रतिष्ठा मिळाल्यास, तसेच संंस्कृत ठरावीक लोकांपुरती मर्यादित न राहता, प्रचार-प्रसारासाठी सर्वांगीण प्रयत्न केले, तर संस्कृत भाषेलाही नवसंंजीवनी मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राज्यसभेचे खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केला. संस्कृत भाषा सभेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात रमेश देशमुख आणि सरिता देशमुख यांना संस्कृत भाषा संवर्धनासाठीचा या वर्षीचा पहिला कै.डॉ.वि.म. गोगटे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात यावेळी व्यासपीठावर महापौर सतीश कुलकर्णी, डॉ.विकास गोगटे, विवेक गोगटे, रमेश देशमुख, जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, देवदत्त जोशी, सरिता देशमुख, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, शोभा सोनवणे, तेजश्री वेदविख्यात, मीनल पत्की आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ.सहस्त्रबुद्धे यांनी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात संस्कृतला महत्त्वपूर्ण स्थान दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. पुन्हा जुन्या संस्कृतीकडे वळण्यासाठी नवे राष्ट्रीय धोरण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाला मातृभाषेतून शिक्षण देण्याचा अधिकार या राष्ट्रीय धोरणाने दिला आहे. त्यामुळे आगामी काळात संस्कृतसारख्या पुरातन भाषेला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. तसे पाहिले, तर संस्कृत ही अनेक भारतीय भाषांपैकी विदेशातील अनेक भाषांची जननी आहे. संस्कृत आणि पर्शियन भाषेचे व्याकरण पाणिनी यांनी रचलेले आहे. याप्रमाणेच भारतासह इंडोनेशिया, मलेशिया, जपान, व्हिएतनाम येथेही भारतीय संस्कृतीची पाळेमुळे दिसतात, ती संस्कृत भाषेमुळेच, असेही त्यांनी नमूद केले. संस्कृतमुळेच भारतीयांची आचरणाची संस्कृती उच्च राहिली आहे. असे असले ,तरी सध्या संस्कृत ही ठरावीक गटाची भाषा असा असलेला आक्षेप आणि संस्कृत भाषेविषयी असलेली विमुखता दूर करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन डॉ.अभिजीत सराफ, मीनल पत्की, अमित नागरे यांनी केले.

 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक