शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

संस्कृत भाषेला जिवंत ठेवण्याची जबाबदारी भारतीयांचीच! : विनय सहस्त्रबुद्धे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 01:25 IST

संस्कृतमुळे भारतीय संस्कृती देश-विदेशात पोहोचली आहे. भारतीय संस्कृतीची पाळेमुळे संस्कृत भाषेत रुजली आहेत. त्यामुळे संस्कृत भाषेला जिवंत ठेवण्याची जबाबदारी भारतीयांचीच आहे. इंंग्रजी संभाषणाप्रमाणे संस्कृत संभाषणाला प्रतिष्ठा मिळाल्यास, तसेच संंस्कृत ठरावीक लोकांपुरती मर्यादित न राहता, प्रचार-प्रसारासाठी सर्वांगीण प्रयत्न केले, तर संस्कृत भाषेलाही नवसंंजीवनी मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राज्यसभेचे खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केला. संस्कृत भाषा सभेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात रमेश देशमुख आणि सरिता देशमुख यांना संस्कृत भाषा संवर्धनासाठीचा या वर्षीचा पहिला कै.डॉ.वि.म. गोगटे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देसंस्कृत भाषा सभा संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात देशमुख दाम्पत्याला पुरस्कार

नाशिक : संस्कृतमुळे भारतीय संस्कृती देश-विदेशात पोहोचली आहे. भारतीय संस्कृतीची पाळेमुळे संस्कृत भाषेत रुजली आहेत. त्यामुळे संस्कृत भाषेला जिवंत ठेवण्याची जबाबदारी भारतीयांचीच आहे. इंंग्रजी संभाषणाप्रमाणे संस्कृत संभाषणाला प्रतिष्ठा मिळाल्यास, तसेच संंस्कृत ठरावीक लोकांपुरती मर्यादित न राहता, प्रचार-प्रसारासाठी सर्वांगीण प्रयत्न केले, तर संस्कृत भाषेलाही नवसंंजीवनी मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राज्यसभेचे खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केला. संस्कृत भाषा सभेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात रमेश देशमुख आणि सरिता देशमुख यांना संस्कृत भाषा संवर्धनासाठीचा या वर्षीचा पहिला कै.डॉ.वि.म. गोगटे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात यावेळी व्यासपीठावर महापौर सतीश कुलकर्णी, डॉ.विकास गोगटे, विवेक गोगटे, रमेश देशमुख, जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, देवदत्त जोशी, सरिता देशमुख, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, शोभा सोनवणे, तेजश्री वेदविख्यात, मीनल पत्की आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ.सहस्त्रबुद्धे यांनी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात संस्कृतला महत्त्वपूर्ण स्थान दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. पुन्हा जुन्या संस्कृतीकडे वळण्यासाठी नवे राष्ट्रीय धोरण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाला मातृभाषेतून शिक्षण देण्याचा अधिकार या राष्ट्रीय धोरणाने दिला आहे. त्यामुळे आगामी काळात संस्कृतसारख्या पुरातन भाषेला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. तसे पाहिले, तर संस्कृत ही अनेक भारतीय भाषांपैकी विदेशातील अनेक भाषांची जननी आहे. संस्कृत आणि पर्शियन भाषेचे व्याकरण पाणिनी यांनी रचलेले आहे. याप्रमाणेच भारतासह इंडोनेशिया, मलेशिया, जपान, व्हिएतनाम येथेही भारतीय संस्कृतीची पाळेमुळे दिसतात, ती संस्कृत भाषेमुळेच, असेही त्यांनी नमूद केले. संस्कृतमुळेच भारतीयांची आचरणाची संस्कृती उच्च राहिली आहे. असे असले ,तरी सध्या संस्कृत ही ठरावीक गटाची भाषा असा असलेला आक्षेप आणि संस्कृत भाषेविषयी असलेली विमुखता दूर करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन डॉ.अभिजीत सराफ, मीनल पत्की, अमित नागरे यांनी केले.

 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक