शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

संस्कृत भाषेला जिवंत ठेवण्याची जबाबदारी भारतीयांचीच! : विनय सहस्त्रबुद्धे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 01:25 IST

संस्कृतमुळे भारतीय संस्कृती देश-विदेशात पोहोचली आहे. भारतीय संस्कृतीची पाळेमुळे संस्कृत भाषेत रुजली आहेत. त्यामुळे संस्कृत भाषेला जिवंत ठेवण्याची जबाबदारी भारतीयांचीच आहे. इंंग्रजी संभाषणाप्रमाणे संस्कृत संभाषणाला प्रतिष्ठा मिळाल्यास, तसेच संंस्कृत ठरावीक लोकांपुरती मर्यादित न राहता, प्रचार-प्रसारासाठी सर्वांगीण प्रयत्न केले, तर संस्कृत भाषेलाही नवसंंजीवनी मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राज्यसभेचे खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केला. संस्कृत भाषा सभेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात रमेश देशमुख आणि सरिता देशमुख यांना संस्कृत भाषा संवर्धनासाठीचा या वर्षीचा पहिला कै.डॉ.वि.म. गोगटे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देसंस्कृत भाषा सभा संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात देशमुख दाम्पत्याला पुरस्कार

नाशिक : संस्कृतमुळे भारतीय संस्कृती देश-विदेशात पोहोचली आहे. भारतीय संस्कृतीची पाळेमुळे संस्कृत भाषेत रुजली आहेत. त्यामुळे संस्कृत भाषेला जिवंत ठेवण्याची जबाबदारी भारतीयांचीच आहे. इंंग्रजी संभाषणाप्रमाणे संस्कृत संभाषणाला प्रतिष्ठा मिळाल्यास, तसेच संंस्कृत ठरावीक लोकांपुरती मर्यादित न राहता, प्रचार-प्रसारासाठी सर्वांगीण प्रयत्न केले, तर संस्कृत भाषेलाही नवसंंजीवनी मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राज्यसभेचे खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केला. संस्कृत भाषा सभेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात रमेश देशमुख आणि सरिता देशमुख यांना संस्कृत भाषा संवर्धनासाठीचा या वर्षीचा पहिला कै.डॉ.वि.म. गोगटे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात यावेळी व्यासपीठावर महापौर सतीश कुलकर्णी, डॉ.विकास गोगटे, विवेक गोगटे, रमेश देशमुख, जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, देवदत्त जोशी, सरिता देशमुख, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, शोभा सोनवणे, तेजश्री वेदविख्यात, मीनल पत्की आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ.सहस्त्रबुद्धे यांनी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात संस्कृतला महत्त्वपूर्ण स्थान दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. पुन्हा जुन्या संस्कृतीकडे वळण्यासाठी नवे राष्ट्रीय धोरण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाला मातृभाषेतून शिक्षण देण्याचा अधिकार या राष्ट्रीय धोरणाने दिला आहे. त्यामुळे आगामी काळात संस्कृतसारख्या पुरातन भाषेला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. तसे पाहिले, तर संस्कृत ही अनेक भारतीय भाषांपैकी विदेशातील अनेक भाषांची जननी आहे. संस्कृत आणि पर्शियन भाषेचे व्याकरण पाणिनी यांनी रचलेले आहे. याप्रमाणेच भारतासह इंडोनेशिया, मलेशिया, जपान, व्हिएतनाम येथेही भारतीय संस्कृतीची पाळेमुळे दिसतात, ती संस्कृत भाषेमुळेच, असेही त्यांनी नमूद केले. संस्कृतमुळेच भारतीयांची आचरणाची संस्कृती उच्च राहिली आहे. असे असले ,तरी सध्या संस्कृत ही ठरावीक गटाची भाषा असा असलेला आक्षेप आणि संस्कृत भाषेविषयी असलेली विमुखता दूर करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन डॉ.अभिजीत सराफ, मीनल पत्की, अमित नागरे यांनी केले.

 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक