शहरं
Join us  
Trending Stories
1
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
2
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
3
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
4
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
5
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
6
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
7
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
8
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
9
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
10
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
11
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
12
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
13
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
14
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
15
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
16
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
18
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
19
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
20
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा

आमदाराच्या कार्यालयात ठिय्या देऊनही अपुरे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:36 AM

पावसाने दडी मारल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ५५ टक्के पाणी साठल्यामुळे महापालिकेने एक दिवसाचा पाणीपुरवठा कपातीचा निर्णय मागे घेतला असतानाही पंचवटीतील गणेशवाडी परिसरात काही भागात पाणी येत नाही,

पंचवटी : पावसाने दडी मारल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ५५ टक्के पाणी साठल्यामुळे महापालिकेने एक दिवसाचा पाणीपुरवठा कपातीचा निर्णय मागे घेतला असतानाही पंचवटीतील गणेशवाडी परिसरात काही भागात पाणी येत नाही, तर काही ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने ऐन पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने संतप्त महिलांनी थेट आमदार बाळासाहेब सानप यांच्या संपर्क कार्यालयात ठिय्या मांडला, मात्र तरीही प्रश्न सुटला नाही.गणेशवाडीत गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, त्यात प्रशासनाने दर गुरुवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद केल्याने तेव्हापासून नळाला पाणी येतच नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. पाणी येत नसल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, कधी गंगाघाटावर जाऊन वापरासाठी पाणी आणावे लागते तर कधी अन्य भागात राहणाºया नागरिकांकडून पाणी मागावे लागते. परिसरात पाणी कमी दाबाने येत असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पाणीपुरवठा सुरळीत करावा यासाठी महिलांनी आमदार सानप यांच्या कार्यालयात ठिय्या देऊन हकिकत कथन केली. परंतु दुसºया दिवशीदेखील परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने, तर काही भागात झालाच नसल्याने महिलांनी नाराजी दर्शवून संताप व्यक्त केला आहे.पाण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून येथील नागरिकांना कसरत करावी लागत आहे. यापूर्वी देखील नागरिकांनी विभागीय कार्यालयात तक्रारी केलेल्या आहेत. मात्र पाणीपुरवठा दोन दिवसात सुरळीत होईल असे उत्तर वारंवार मिळत गेले. प्रत्यक्षात मात्र सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढतच गेला. शहरात अन्यत्र एकवेळ पुरेवा पाणीपुरवठा होत असतांना फक्त गणेशवाडी आणि आजुबाजूच्या परिसरात पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांनी या संदर्भात थेट आमदाराकडेच आपली भूमिका मांडली.एकीकडे पाण्याची कमतरता असतांना पंचवटीतल काही भागात मात्र पाण्याचा मोठा वापर होत असल्याचे देखील चित्र आहे. शहरात एकवेळ पाणी पुरवठा केला जात असतांनाही अनेक लोक पाण्याचा गैरवापर करीत असल्याकडे देखील नागरिकांनी लक्ष वेधले. सध्या पाणीपुरवठा कमी करण्यात आला असतांना नागरिकांना समान पाणीवाटप होणे अपेक्षित आहे. मात्र काही भागात धो-धो पाणी मिळते आणि गणेशवाडीसह आजुबाजूच्या नागरिकांना कमी दाबाने पाणी दिले जात असल्यामुळे यातून तातडीने मार्ग काढावा अशी आग्रही मागणी करण्यात आली.सध्या धरणात कमी जलसाठा असल्याने संपूर्ण नाशिक शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. गणेशवाडी येथे कमी पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार असून, लागलीच संबंधित विभागाला पाणीपुरवठा व्यवस्थित करावा, अशा सूचना दिल्या आहेत.- बाळासाहेब सानप, आमदार

टॅग्स :water shortageपाणीकपातMLAआमदारNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका