शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
2
Nanded Murder Case : "तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मारुन ये....", सक्षमला मारण्याआधी पोलीस चौकीतील घटनाक्रम; आंचलने सांगितली धक्कादायक माहिती
3
एका झटक्यात चांदीची किंमत ९३८१ रुपयांनी वाढली, सोन्यातही जोरदार वाढ; पाहा नवे दर
4
श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली...
5
पाक लष्कराचा 'बॉस' कोण? COAS मुनीर यांचा कार्यकाळ संपला, पण CDFचे पद रिकामेच! नेमका अडसर कशाचा?
6
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
7
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
8
नेव्ही ऑफिसरच्या भूमिकेत दिलजीत दोसांझ, 'बॉर्डर २'मधून अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आउट
9
चुकीच्या वेळी दूध प्यायल्याने मुलांच्या वाढीवर परिणाम? सकाळ की संध्याकाळ... 'ही' आहे सर्वोत्तम वेळ
10
लग्नासाठी ऑनलाइन वधू शोधत होता अन् लागला ४९ लाखांचा चुना; पीचडी करण्याऱ्या तरुणासोबत काय घडलं?
11
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
12
भारतीय युवकानं नाकारली ६७ लाखांची जॉब ऑफर; 'वर्क फ्रॉम होम'पासून का काढतायेत पळ? समोर आलं कारण
13
Ajit Pawar: जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
14
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
15
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
16
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
17
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
18
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
19
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
20
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील युवकांनी सकारात्मक होण्याची गरज; युवा राजदूत अभिजीत दिघावकर याचे मत

By धनंजय रिसोडकर | Updated: August 10, 2019 22:49 IST

नाशिक- जगभरातील युवकांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे जगाचे लक्ष वेधले जावे, सक्रीयपणे समाजासाठी योगदान देण्याची उर्जा निर्माण व्हावी. तसेच युवकांना योग्य मार्ग आणि दिशा देऊन सर्वांगीण विकास साधला जावा, या उद्देशाने १२ आॅगस्टला आंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. सोमवारी (दि. १२) असलेल्या आंतरराष्टÑीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर आंतराष्टÑीय युवा परिषदेतील भारताचा युवा राजदूत अभिजीत दिघावकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आजच्या युवकांकडे सकारात्मक उर्जा आहे. त्यामुळे युवकांनी सकारात्मक बनले पाहीजे असे मत लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देयुवा पिढीला सक्षम करण्याची गरजयुवकांना सर्वच क्षेत्रात समान संधीची आवश्यकता

नाशिक- जगभरातील युवकांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे जगाचे लक्ष वेधले जावे, सक्रीयपणे समाजासाठी योगदान देण्याची उर्जा निर्माण व्हावी. तसेच युवकांना योग्य मार्ग आणि दिशा देऊन सर्वांगीण विकास साधला जावा, या उद्देशाने १२ आॅगस्टला आंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. सोमवारी (दि. १२) असलेल्या आंतरराष्टÑीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर आंतराष्टÑीय युवा परिषदेतील भारताचा युवा राजदूत अभिजीत दिघावकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आजच्या युवकांकडे सकारात्मक उर्जा आहे. त्यामुळे युवकांनी सकारात्मक बनले पाहीजे असे मत लोकमतशी बोलताना व्यक्त केले.प्रश्न : आंतरराष्टÑीय युवा दिनाच्या महत्व काय?दिघावकर : १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (युनो) आमसभेत एक ठराव पारित होऊन १२ आॅगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून पाळण्यात येण्याचे ठरले आणि त्यानंतर २००० सालापासून दरवर्षी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. सर्वांना समान संधी उपलब्ध करून देऊन युवा पिढीला सक्षम करणे, शांत आणि समृद्ध समाज निर्माण करणे, त्या माध्यमातून सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधणे हेच या आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या आयोजनाचे ध्येय आहे.प्रश्न : देशाला विकसित राष्टÑ करण्यासाठी भारतीय युवकांना कोणत्या प्रकारच्या संधी मिळायला हव्या असे तुम्हाला वाटते ?दिघावकर : भारताच्या लोकसंख्येपैकी सुमारे ६० टक्के लोकसंख्या ३५ वर्षांच्या आतील आहे. युवकांची हीच प्रचंड संख्या भारतासारख्या विकसनशील देशाला विकिसत राष्ट्रांच्या पंक्तीत नेऊन बसविण्यासाठी महत्वाची ठरणार आहे. राष्ट्रांचा विकास हा तरु णाईचा कल्पकतेने, कुशलतेने आणि सकारात्मकपणे वापर करूनच आजपर्यंत झालेला आहे. परंतु भारताला या मनुष्यबळाचा फायदा करून घेण्यासाठी युवकांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, तसेच आर्थिक, सामाजिक, आणि राजकीय क्षेत्रामध्ये समान संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.प्रश्न : तुम्ही युवकांसाठी कोणत्या प्रकारचे सामाजिक उपक्रम करता ?दिघावकर : आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्र, अतिदुर्गम भागातील पाड्यांवर जाऊन शिक्षणाबाबत प्रबोधन, स्वच्छतेबाबत जनजागृती, पर्यावरण संवर्धनात त्यांचा सहभाग वाढवणे, मुलींची लग्न अठराव्या वर्षानंतरच करण्यामागील कारणांचा प्रसार, पुरुष-महिला समानता, जनसंख्या नियंत्रणात राखण्याबाबत प्रबोधन तसेच युवावर्गासाठी आणि गोरगरीब शेतकरी व महिलांसाठी उपयुक्त असलेल्या शासकीय योजनांची माहिती देणे,ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये जाऊन युवक-युवतींशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण अशा प्रकारे आमच्या जाणीव या संस्थेच्या माध्यमातून कार्य केले जात असून त्याला युवा वर्गाकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतो.प्रश्न : भारतातील युवा पिढी विषयी काय मत आहे?दिघावकर: वाढत्या युवा संख्येमुळे विविध समस्यांनाही भारताला तोंड द्यावे लागणार आहे. बेरोजगारी आणि त्यामुळे गुन्हेगारी वृत्तीकडे कल वाढणे, सोशल मीडियाचा अतिवापर, युवकांमधील वाढतं नैराश्य आणि असंतोष, यांसारख्या विविध समस्यांना वेळीच पायबंद घालत युवापिढीला सकारात्मक बनण्याची गरज आहे.मुलाखत: धनंजय रिसोडकर

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिकInternationalआंतरराष्ट्रीय