शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील युवकांनी सकारात्मक होण्याची गरज; युवा राजदूत अभिजीत दिघावकर याचे मत

By धनंजय रिसोडकर | Updated: August 10, 2019 22:49 IST

नाशिक- जगभरातील युवकांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे जगाचे लक्ष वेधले जावे, सक्रीयपणे समाजासाठी योगदान देण्याची उर्जा निर्माण व्हावी. तसेच युवकांना योग्य मार्ग आणि दिशा देऊन सर्वांगीण विकास साधला जावा, या उद्देशाने १२ आॅगस्टला आंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. सोमवारी (दि. १२) असलेल्या आंतरराष्टÑीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर आंतराष्टÑीय युवा परिषदेतील भारताचा युवा राजदूत अभिजीत दिघावकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आजच्या युवकांकडे सकारात्मक उर्जा आहे. त्यामुळे युवकांनी सकारात्मक बनले पाहीजे असे मत लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देयुवा पिढीला सक्षम करण्याची गरजयुवकांना सर्वच क्षेत्रात समान संधीची आवश्यकता

नाशिक- जगभरातील युवकांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे जगाचे लक्ष वेधले जावे, सक्रीयपणे समाजासाठी योगदान देण्याची उर्जा निर्माण व्हावी. तसेच युवकांना योग्य मार्ग आणि दिशा देऊन सर्वांगीण विकास साधला जावा, या उद्देशाने १२ आॅगस्टला आंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. सोमवारी (दि. १२) असलेल्या आंतरराष्टÑीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर आंतराष्टÑीय युवा परिषदेतील भारताचा युवा राजदूत अभिजीत दिघावकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आजच्या युवकांकडे सकारात्मक उर्जा आहे. त्यामुळे युवकांनी सकारात्मक बनले पाहीजे असे मत लोकमतशी बोलताना व्यक्त केले.प्रश्न : आंतरराष्टÑीय युवा दिनाच्या महत्व काय?दिघावकर : १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (युनो) आमसभेत एक ठराव पारित होऊन १२ आॅगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून पाळण्यात येण्याचे ठरले आणि त्यानंतर २००० सालापासून दरवर्षी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. सर्वांना समान संधी उपलब्ध करून देऊन युवा पिढीला सक्षम करणे, शांत आणि समृद्ध समाज निर्माण करणे, त्या माध्यमातून सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधणे हेच या आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या आयोजनाचे ध्येय आहे.प्रश्न : देशाला विकसित राष्टÑ करण्यासाठी भारतीय युवकांना कोणत्या प्रकारच्या संधी मिळायला हव्या असे तुम्हाला वाटते ?दिघावकर : भारताच्या लोकसंख्येपैकी सुमारे ६० टक्के लोकसंख्या ३५ वर्षांच्या आतील आहे. युवकांची हीच प्रचंड संख्या भारतासारख्या विकसनशील देशाला विकिसत राष्ट्रांच्या पंक्तीत नेऊन बसविण्यासाठी महत्वाची ठरणार आहे. राष्ट्रांचा विकास हा तरु णाईचा कल्पकतेने, कुशलतेने आणि सकारात्मकपणे वापर करूनच आजपर्यंत झालेला आहे. परंतु भारताला या मनुष्यबळाचा फायदा करून घेण्यासाठी युवकांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, तसेच आर्थिक, सामाजिक, आणि राजकीय क्षेत्रामध्ये समान संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.प्रश्न : तुम्ही युवकांसाठी कोणत्या प्रकारचे सामाजिक उपक्रम करता ?दिघावकर : आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्र, अतिदुर्गम भागातील पाड्यांवर जाऊन शिक्षणाबाबत प्रबोधन, स्वच्छतेबाबत जनजागृती, पर्यावरण संवर्धनात त्यांचा सहभाग वाढवणे, मुलींची लग्न अठराव्या वर्षानंतरच करण्यामागील कारणांचा प्रसार, पुरुष-महिला समानता, जनसंख्या नियंत्रणात राखण्याबाबत प्रबोधन तसेच युवावर्गासाठी आणि गोरगरीब शेतकरी व महिलांसाठी उपयुक्त असलेल्या शासकीय योजनांची माहिती देणे,ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये जाऊन युवक-युवतींशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण अशा प्रकारे आमच्या जाणीव या संस्थेच्या माध्यमातून कार्य केले जात असून त्याला युवा वर्गाकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतो.प्रश्न : भारतातील युवा पिढी विषयी काय मत आहे?दिघावकर: वाढत्या युवा संख्येमुळे विविध समस्यांनाही भारताला तोंड द्यावे लागणार आहे. बेरोजगारी आणि त्यामुळे गुन्हेगारी वृत्तीकडे कल वाढणे, सोशल मीडियाचा अतिवापर, युवकांमधील वाढतं नैराश्य आणि असंतोष, यांसारख्या विविध समस्यांना वेळीच पायबंद घालत युवापिढीला सकारात्मक बनण्याची गरज आहे.मुलाखत: धनंजय रिसोडकर

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिकInternationalआंतरराष्ट्रीय