शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
2
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
3
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
4
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
5
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
6
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
7
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
8
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
9
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
10
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
11
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
12
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
13
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
14
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

भारतातील युवा पिढी राष्ट्राचा आधारवड- स्नेहलता देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 4:33 PM

राष्ट्राची प्रगती ही युवा पिढीची जबाबदारी असून भारतातील आजची युवा पिढी ही आपल्या राष्ट्राचे आधारवड आहेत. त्यामुळे त्यांनी समाजातील चांगले बघून त्याचे अनुकरण करावे आणि वाईट प्रवृत्तींपासून दूर राहून अशा प्रवृत्ती नष्ट करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख यांनी केले

ठळक मुद्देराष्ट्राची प्रगती युवा पिढीची जबाबदारी युवा पिढीने वाईट प्रवृत्ती नष्ट कराव्यात स्नेहलता देशमुख यांचे विद्यर्थींनींना मार्गदर्शन

नाशिक :  राष्ट्राची प्रगती ही युवा पिढीची जबाबदारी असून भारतातील आजची युवा पिढी ही आपल्या राष्ट्राचे आधारवड आहेत. त्यामुळे त्यांनी समाजातील चांगले बघून त्याचे अनुकरण करावे आणि वाईट प्रवृत्तींपासून दूर राहून अशा प्रवृत्ती नष्ट करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख यांनी केले. एसएमआरके महिला महाविद्यालयाचा ३५ वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवारी (दि.२८) साजरा करण्यात आला.यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी गोखले एजुकेशन सोसायटीचे सचिव सर डॉ. मो. स. गोसावी यांच्यासह व्यासपीठावर साहित्यिक संजय कळमकर, प्राचार्य राम कुलकर्णी, जयंत कुलकर्णी आदि उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना स्नेहलता देशमुख यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीने आता वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातही येण्याजी गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तर प्रमुख पाहूणे साहित्यिक संजय कळमकर यांनी विद्यार्थिनींना वाचनातून आपले अनुभव समृध्द करण्याचा सल्ला देतानाच पुस्तकांना आपले जिवलग मित्र बनवून चांगल्या पुस्तकाचा संग्रह करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सचिव सर डॉ. मो. स. गोसावी यांनी विद्यार्थिनींना शिक्षणाचे महत्व सांगताना उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याचे आवाहन केले.दरम्यान, वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयाचा वार्षिक अंक शतरूपा’ संशोधनात्मक प्रबंधांचा संग्रह ‘इम्प्रेशन्स’ तसेच महाविद्यालयात संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या शोधनिबंधाच्या ई-प्रोसेडींगचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. प्रभारी प्राचार्य साधना देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. रसिका सप्रे, स्नेहा रत्नपारखी, व प्रा. निलेश रोटे यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा. कविता पाटील यांनी मानले. याप्रसंगी माजी प्राचार्य डॉ. डी. के. गोसावी, प्रा. बी. देवराज, उद्योजक नीलिमा पाटील,  उपप्राचार्य डॉ. कविता पाटील, डॉ. नीलम बोकील विद्यार्थिनी सभेच्या प्रमुख डॉ. कविता खोलगडे, प्रा. सुरेखा जोगी आदी उपस्थित होते. 

गुणवंतांचा गौरवशैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करणाºया विद्यार्थिनींचा, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया प्राचार्य, प्राध्यापक यांनाही याप्रसंगी गौरविण्यात आले. तसेच संस्थेच्या विविध कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले. 

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय