शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

'बोफोर्स'नंतर भारतीय सैन्याला मिळाल्या होवित्झर अन् वज्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 14:31 IST

भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा मानल्या जाणाऱ्या व युद्धात निर्णायक भूमिका ठरविणाऱ्या तोफखान्याला दोन अत्याधुनिक विदेशी तोफा शुक्रवारी नाशिक मधील देवळालीच्या केंद्रात दिमाखदार लष्करी सोहळ्यात हस्तांतरित करण्यात आल्या.

ठळक मुद्देलष्करी थाटात होवित्झर व वज्र या आधुनिक तोफांचे हस्तांतरण करण्यात आले. मेक इन इंडिया संकल्पनेतून येणाऱ्या काळात के -9  वज्र तसेच एम 777 ची निर्मिती करणार संरक्षण  सामग्री निर्मितीत भारत स्वयंसिद्ध भविष्यात होऊ शकेल, असा विश्वास

अझहर शेख

नाशिक : भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा मानल्या जाणाऱ्या व युद्धात निर्णायक भूमिका ठरविणाऱ्या तोफखान्याला दोन अत्याधुनिक विदेशी तोफा शुक्रवारी (9 नोव्हेंबर) नाशिक मधील देवळालीच्या केंद्रात दिमाखदार लष्करी सोहळ्यात हस्तांतरित करण्यात आल्या.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत उपस्थित होते.

देवळाली तोफखाना केंद्राच्या गोळीबार मैदानावर चित्तथरारक तोफांच्या बॉम्बहल्ल्याच्या प्रात्यक्षिकाच्या साक्षीने लष्करी थाटात होवित्झर व वज्र या आधुनिक तोफांचे हस्तांतरण करण्यात आले. पाकिस्तान, चीनसारख्या शत्रू राष्ट्रांशी दोन हात करण्यासाठी दोन अत्याधुनिक तोफा भारतीय सैन्यदलात दाखल झाल्या आहेत यामुळे शत्रूंचे धाबे दणाणले आहेत. बोफोर्सनंतर भारतीय तोफखान्यात पहिल्यांदाच आधुनिक तंत्रज्ञानाच्या तोफा दाखल झाल्याने सैन्याची ताकद अन जवानांचे मनोबल वाढले आहे. 

उंच पर्वतीय प्रदेशातीळ भारतीय सीमांचे संरक्षण करण्यासाठी सैन्याला प्रयत्नांची पराकाष्ठा लागत होती. 1977 साली पाकिस्तान सोबतच्या युद्धानंतर भारतीय तोफखान्यात बोफोर्स दाखल झाली. मात्र भ्रष्टाचारच्या वादाच्याच्या भोवऱ्यात बोफोर्स अडकली.  त्यानंतर तोफांची खरेदीच थांबवण्यात आली. अखेर तब्ब्ल 30 ते 35 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर  ‘के-९ वज्र’ आणि अति उंच पर्वतीय क्षेत्रात वापरता येतील, अशा हलक्या वजनाच्या होवित्झर सारख्या तोफाच्या खरेदीचा मार्ग मोकळा झाला. भारतीय तोफखाना दलाकडे वेगवेगळ्या अंतरांवर मारा करणाऱ्या तोफा आहेत. जुनाट तोफांचे बॅरल आणि सुटे भाग उपलब्ध होत नसल्याने त्यांची देखभाल दुरुस्ती जिकिरीची ठरली आहे. विद्यमान सरकारने दक्षिण कोरियन बनावटीच्या के-९ वज्र – टी १०० तोफा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० तोफा दक्षिण कोरियातून घेऊन उर्वरित ९० तोफांची देशात निर्मिती करण्यात येणार असल्याचे सीतारामन  यांनी सांगितले.

यावेळी देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी केंद्र सरकारच्या थेट धोरणांमुळे देशाच्या लष्करात तीन अत्याधुनिक शस्त्र दाखल झाल्याचं स्पष्ट केलं. या नवीन तोफांमुळे भारतीय लष्कराची ताकद वाढणार आहे असं देखील सीतारामन म्हणाल्या. मेक इन इंडिया संकल्पनेतून येणाऱ्या काळात के -9  वज्र तसेच एम 777 ची निर्मिती करणार असल्याचं देखील  सीतारामन यांनी स्पष्ट केलं. संरक्षण सामग्री निर्मितीमध्ये देश वेगवान वाटचाल करत आहे असं त्या म्हणाल्या. चार वर्षात सरकारने कमी वेळात काम करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच 2006 पासून या तोफांच्या खरेदीसाठी प्रयत्न सूरू होते. मात्र आमच्या सरकारच्या काळात ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण झाल्याने त्याचा अभिमान वाटतो, असे सीतारामन माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. गेल्या 30 वर्षांतील लष्करात जे बदल व्हायला हवं होतं ते फक्त मागील 4 वर्षात आम्ही केल्याचा दावा ही त्यांनी केला. विशेष म्हणजे या तोफा मेड इन इंडिया अंतर्गत भारतात बनवल्या जाणार आहे. त्यामुळे संरक्षण  सामग्री निर्मितीत भारत स्वयंसिद्ध भविष्यात होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :NashikनाशिकNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBipin Rawatबिपीन रावत