शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

'बोफोर्स'नंतर भारतीय सैन्याला मिळाल्या होवित्झर अन् वज्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 14:31 IST

भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा मानल्या जाणाऱ्या व युद्धात निर्णायक भूमिका ठरविणाऱ्या तोफखान्याला दोन अत्याधुनिक विदेशी तोफा शुक्रवारी नाशिक मधील देवळालीच्या केंद्रात दिमाखदार लष्करी सोहळ्यात हस्तांतरित करण्यात आल्या.

ठळक मुद्देलष्करी थाटात होवित्झर व वज्र या आधुनिक तोफांचे हस्तांतरण करण्यात आले. मेक इन इंडिया संकल्पनेतून येणाऱ्या काळात के -9  वज्र तसेच एम 777 ची निर्मिती करणार संरक्षण  सामग्री निर्मितीत भारत स्वयंसिद्ध भविष्यात होऊ शकेल, असा विश्वास

अझहर शेख

नाशिक : भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा मानल्या जाणाऱ्या व युद्धात निर्णायक भूमिका ठरविणाऱ्या तोफखान्याला दोन अत्याधुनिक विदेशी तोफा शुक्रवारी (9 नोव्हेंबर) नाशिक मधील देवळालीच्या केंद्रात दिमाखदार लष्करी सोहळ्यात हस्तांतरित करण्यात आल्या.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत उपस्थित होते.

देवळाली तोफखाना केंद्राच्या गोळीबार मैदानावर चित्तथरारक तोफांच्या बॉम्बहल्ल्याच्या प्रात्यक्षिकाच्या साक्षीने लष्करी थाटात होवित्झर व वज्र या आधुनिक तोफांचे हस्तांतरण करण्यात आले. पाकिस्तान, चीनसारख्या शत्रू राष्ट्रांशी दोन हात करण्यासाठी दोन अत्याधुनिक तोफा भारतीय सैन्यदलात दाखल झाल्या आहेत यामुळे शत्रूंचे धाबे दणाणले आहेत. बोफोर्सनंतर भारतीय तोफखान्यात पहिल्यांदाच आधुनिक तंत्रज्ञानाच्या तोफा दाखल झाल्याने सैन्याची ताकद अन जवानांचे मनोबल वाढले आहे. 

उंच पर्वतीय प्रदेशातीळ भारतीय सीमांचे संरक्षण करण्यासाठी सैन्याला प्रयत्नांची पराकाष्ठा लागत होती. 1977 साली पाकिस्तान सोबतच्या युद्धानंतर भारतीय तोफखान्यात बोफोर्स दाखल झाली. मात्र भ्रष्टाचारच्या वादाच्याच्या भोवऱ्यात बोफोर्स अडकली.  त्यानंतर तोफांची खरेदीच थांबवण्यात आली. अखेर तब्ब्ल 30 ते 35 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर  ‘के-९ वज्र’ आणि अति उंच पर्वतीय क्षेत्रात वापरता येतील, अशा हलक्या वजनाच्या होवित्झर सारख्या तोफाच्या खरेदीचा मार्ग मोकळा झाला. भारतीय तोफखाना दलाकडे वेगवेगळ्या अंतरांवर मारा करणाऱ्या तोफा आहेत. जुनाट तोफांचे बॅरल आणि सुटे भाग उपलब्ध होत नसल्याने त्यांची देखभाल दुरुस्ती जिकिरीची ठरली आहे. विद्यमान सरकारने दक्षिण कोरियन बनावटीच्या के-९ वज्र – टी १०० तोफा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० तोफा दक्षिण कोरियातून घेऊन उर्वरित ९० तोफांची देशात निर्मिती करण्यात येणार असल्याचे सीतारामन  यांनी सांगितले.

यावेळी देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी केंद्र सरकारच्या थेट धोरणांमुळे देशाच्या लष्करात तीन अत्याधुनिक शस्त्र दाखल झाल्याचं स्पष्ट केलं. या नवीन तोफांमुळे भारतीय लष्कराची ताकद वाढणार आहे असं देखील सीतारामन म्हणाल्या. मेक इन इंडिया संकल्पनेतून येणाऱ्या काळात के -9  वज्र तसेच एम 777 ची निर्मिती करणार असल्याचं देखील  सीतारामन यांनी स्पष्ट केलं. संरक्षण सामग्री निर्मितीमध्ये देश वेगवान वाटचाल करत आहे असं त्या म्हणाल्या. चार वर्षात सरकारने कमी वेळात काम करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच 2006 पासून या तोफांच्या खरेदीसाठी प्रयत्न सूरू होते. मात्र आमच्या सरकारच्या काळात ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण झाल्याने त्याचा अभिमान वाटतो, असे सीतारामन माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. गेल्या 30 वर्षांतील लष्करात जे बदल व्हायला हवं होतं ते फक्त मागील 4 वर्षात आम्ही केल्याचा दावा ही त्यांनी केला. विशेष म्हणजे या तोफा मेड इन इंडिया अंतर्गत भारतात बनवल्या जाणार आहे. त्यामुळे संरक्षण  सामग्री निर्मितीत भारत स्वयंसिद्ध भविष्यात होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :NashikनाशिकNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBipin Rawatबिपीन रावत