शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

साखर कारखान्यांना टाळे लागूनही जिल्ह्यात ऊस लागवड क्षेत्रात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:35 IST

नाशिक : जिल्ह्यातील कादवा सहकारी साखर कारखानावगळता इतर सर्व साखर कारखाने बंद असूनही यावर्षीच्या हंगामात तब्बल १७ हजार ६८८.२१ हेक्टरवर ऊसलागवड करण्यात आली आहे.

नाशिक : जिल्ह्यातील कादवा सहकारी साखर कारखानावगळता इतर सर्व साखर कारखाने बंद असूनही यावर्षीच्या हंगामात तब्बल १७ हजार ६८८.२१ हेक्टरवर ऊसलागवड करण्यात आली आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी ऊसलागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, जिल्ह्यात ऊसक्षेत्र वाढले मात्र कारखाने थकले, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शाश्वत पीक म्हणून उसाकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांची मदार संपूर्णपणे परजिल्ह्यातील कारखान्यांवर आहे. विशेष म्हणजे यावर्षी कोविड-१९च्या संकटाचा ऊस उत्पादकांनाही फटका बसला असला तरी ऊस लागवडीचा उत्साह कमी झालेला नाही, असे दिसून येत आहे.निफाड तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर ऊसलागवड करण्यात आली असून, त्याखालोखाल दिंडोरी तालुक्यातील क्षेत्र आहे. ऊस-लागवडीत जिल्ह्यातील आदिवासी तालुकेही मागे नसून सुरगाणावगळता पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्येही दिवसेंदिवस उसाचे क्षेत्र वाढत आहे.वेगवेगळ्या कारणांमुळे जिल्ह्यातील निसाका, रासाका, नासाका, वसाका, गिसाका हे सर्व साखर कारखाने मागील काही वर्षांपासून बंद आहेत. केवळ कादवा सहकारी साखर कारखाना सुरू आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील संगमनेर, लोणी, कोळपेवाडी, प्रवरा येथील साखर कारखान्यांना त्यांचे गाळप पूर्ण होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होऊ लागला आहे. जिल्ह्यात आडसाली उसाला चांगला उतारा मिळत असल्याने हे कारखाने हंगामाच्या सुरुवातीलाच येऊन येथील ऊस घेऊन जातात. मात्र खोडवा तोडायला टाळाटाळ केली जाते. यामुळे शेतकºयांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. पण उसाशिवाय शाश्वत पिकाचा दुसरा पर्याय नसल्याने ऊस घ्यावा लागतो, असे निफाड तालुक्यातील शेतकºयांनी सांगितले------------------थेट दिल्ली, इंदूरपर्यंत जातो निफाडचा ऊसमागील दोन वर्षे दुष्काळ असला तरी निफाड तालुक्यातील कादवा आणि गोदावरी नदी परिसरातील गावांमधील शेतकºयांना उसाने आधार दिला. जनावरांना चारा म्हणून कसमादे भागातील अनेक शेतकºयांनी निफाडमधून ऊस नेला. त्यावेळी तब्बल चार हजार रुपये गुठ्यांपर्यंत उसाला भाव मिळत होता. उसाची कुट्टी करून जनावरांना घातली जाते. इतकेच नव्हे तर रसवंतीसाठी जिल्ह्यातील उसाला चांगली मागणी आहे. निफाड तालुक्यातून थेट दिल्ली, इंदूरपर्यंत रसवंतीसाठी ऊस जातो. रसवंतीला जाणाºया उसाला बांडीसह भाव मिळतो.-----------------आमच्या भागात दव जास्त पडत असल्याने द्राक्ष होत नाही त्यामुळे उसाशिवाय पर्याय नाही. उसापासून वर्षाकाठी चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे ऊसलागवड परवडते. उसासाठी कारखान्यांकडून काही प्रमाणात भांडवल मिळते त्यामुळे शेतकºयांना आधार मिळतो. त्यामुळे शेतकरी ऊसलागवड करत असतात.- रतन वडघुले, ऊस उत्पादक, जळगाव, ता. निफाड

टॅग्स :Nashikनाशिक