शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांना टाळे लागूनही जिल्ह्यात ऊस लागवड क्षेत्रात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:35 IST

नाशिक : जिल्ह्यातील कादवा सहकारी साखर कारखानावगळता इतर सर्व साखर कारखाने बंद असूनही यावर्षीच्या हंगामात तब्बल १७ हजार ६८८.२१ हेक्टरवर ऊसलागवड करण्यात आली आहे.

नाशिक : जिल्ह्यातील कादवा सहकारी साखर कारखानावगळता इतर सर्व साखर कारखाने बंद असूनही यावर्षीच्या हंगामात तब्बल १७ हजार ६८८.२१ हेक्टरवर ऊसलागवड करण्यात आली आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी ऊसलागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, जिल्ह्यात ऊसक्षेत्र वाढले मात्र कारखाने थकले, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शाश्वत पीक म्हणून उसाकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांची मदार संपूर्णपणे परजिल्ह्यातील कारखान्यांवर आहे. विशेष म्हणजे यावर्षी कोविड-१९च्या संकटाचा ऊस उत्पादकांनाही फटका बसला असला तरी ऊस लागवडीचा उत्साह कमी झालेला नाही, असे दिसून येत आहे.निफाड तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर ऊसलागवड करण्यात आली असून, त्याखालोखाल दिंडोरी तालुक्यातील क्षेत्र आहे. ऊस-लागवडीत जिल्ह्यातील आदिवासी तालुकेही मागे नसून सुरगाणावगळता पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्येही दिवसेंदिवस उसाचे क्षेत्र वाढत आहे.वेगवेगळ्या कारणांमुळे जिल्ह्यातील निसाका, रासाका, नासाका, वसाका, गिसाका हे सर्व साखर कारखाने मागील काही वर्षांपासून बंद आहेत. केवळ कादवा सहकारी साखर कारखाना सुरू आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील संगमनेर, लोणी, कोळपेवाडी, प्रवरा येथील साखर कारखान्यांना त्यांचे गाळप पूर्ण होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होऊ लागला आहे. जिल्ह्यात आडसाली उसाला चांगला उतारा मिळत असल्याने हे कारखाने हंगामाच्या सुरुवातीलाच येऊन येथील ऊस घेऊन जातात. मात्र खोडवा तोडायला टाळाटाळ केली जाते. यामुळे शेतकºयांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. पण उसाशिवाय शाश्वत पिकाचा दुसरा पर्याय नसल्याने ऊस घ्यावा लागतो, असे निफाड तालुक्यातील शेतकºयांनी सांगितले------------------थेट दिल्ली, इंदूरपर्यंत जातो निफाडचा ऊसमागील दोन वर्षे दुष्काळ असला तरी निफाड तालुक्यातील कादवा आणि गोदावरी नदी परिसरातील गावांमधील शेतकºयांना उसाने आधार दिला. जनावरांना चारा म्हणून कसमादे भागातील अनेक शेतकºयांनी निफाडमधून ऊस नेला. त्यावेळी तब्बल चार हजार रुपये गुठ्यांपर्यंत उसाला भाव मिळत होता. उसाची कुट्टी करून जनावरांना घातली जाते. इतकेच नव्हे तर रसवंतीसाठी जिल्ह्यातील उसाला चांगली मागणी आहे. निफाड तालुक्यातून थेट दिल्ली, इंदूरपर्यंत रसवंतीसाठी ऊस जातो. रसवंतीला जाणाºया उसाला बांडीसह भाव मिळतो.-----------------आमच्या भागात दव जास्त पडत असल्याने द्राक्ष होत नाही त्यामुळे उसाशिवाय पर्याय नाही. उसापासून वर्षाकाठी चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे ऊसलागवड परवडते. उसासाठी कारखान्यांकडून काही प्रमाणात भांडवल मिळते त्यामुळे शेतकºयांना आधार मिळतो. त्यामुळे शेतकरी ऊसलागवड करत असतात.- रतन वडघुले, ऊस उत्पादक, जळगाव, ता. निफाड

टॅग्स :Nashikनाशिक