शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकी ओसरली; भिंत ओस

By admin | Updated: March 13, 2017 01:10 IST

नागरिकांची पाठ : कपड्यांऐवजी मिळतायेत चिंध्या

संदीप भालेराव : नाशिकनागपूर येथे सुरू झालेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमापासून प्रोत्साहित होऊन नाशिकमधील काही मंडळांनी शहरात माणुसकीची भिंंत उभी केली. मात्र अल्पावधीतच नाशिककरांनी या भिंतीकडे पाठ केली असून, दुसऱ्याला उपयोगात येतील अशा वस्तूंऐवजी या ठिकाणी अडगळीचे साहित्य आणि कपड्यांच्या चिंध्या टाकल्या जात आहेत. काही ठिकाणी तर भिंत केव्हाच गायब झाली आहे. जेथे भिंत टिकून आहे तेथे नाशिककरांची माणुसकी ओसरल्यामुळे की काय सध्या माणुसकीची भिंत ओस पडल्याचे चित्र आहे. मागीलवर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दानशूर नाशिककरांच्या भरवशावर काही सामाजिक संस्थांनी ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम सुरू केला. आपल्या घरातील वापरात नसलेले, परंतु चांगल्या स्थितीतील कपडे, वस्तू या ठिकाणी आणून द्यायच्या आणि ज्या गरजूंना त्या वस्तू उपयुक्त असतील त्यांनी त्या घेऊन जायच्या’ असा या भिंतीमागचा उद्देश. शहरातील केटीएचएम महाविद्यालय उड्डाणपुलाखाली, गोल्फ क्लबची संरक्षक भिंत तसेच नाशिकरोडला काही ठिकाणी ठराविक भिंत ‘माणुसकीची भिंत’ म्हणून रंगविण्यात आली. या ठिकाणी नको असलेले कपडे अडकविण्यासाठी हॅँगर्स लावण्यात आले. महिला, पुरुष आणि लहान मुले यांच्यासाठी असलेल्या कपड्यांसाठी स्वतंत्र हॅँगर्स लावण्यात आले. त्यावेळी या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र अवघ्या चार-पाच महिन्यांपासून या भिंती ओस पडल्याचे चित्र आहे. गोल्फ क्लबजवळची भिंत तर गायबच झाली आहे. या ठिकाणची पाटीही पुसली गेली आहे. केटीएचएम उड्डाणपुलाखाली भिंत अस्तित्वात आहे. मात्र या ठिकाणी अक्षरक्ष: फाटलेले, मळलेले इतकेच काय तर हात पुसायलाही कुणी वापरणार नाही इतके कळकट्ट कपडे ठेवून देण्यात आले आहे. म्हणचे असे कपडे की ज्याचा वापर कुणालाही होणार नाही. वस्तूतर अभावानेच येतात. त्यातही तुटलेले फ्लॉवर पॉट, रंग उडालेल्या फ्रेम, तुटलेली प्लास्टिकची फुले अशा वस्तू अधिक असतात. खरेतर या वस्तूंचा कुणालाही उपयोग होणार नाही अशाच आहेत. खरेतर इतरांना उपयुक्त ठरतील अशा वस्तू जमा होतील, अशी आयोजकांनी अपेक्षा होती. परंतु लोक घरातील अडगळ कमी करण्यासाठी टाकाऊ वस्तू या भिंतीजवळ टाकत असल्याचे वास्तव समोर आले आहे. वास्तविक हा उपक्रम चळवळ म्हणून पुढे येणे अपेक्षित असताना नाशिककरांच्या नकारात्मक मानसिकतेमुळे हा उपक्रम अर्ध्यावरती सोडून देण्याची नामुष्की ओढावली आहे. (प्रतिनिधी)