शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी, पिकांचं मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 4:42 PM

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांनी भाताची सोंगणी करून, पेंढ्या बांधून ...

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांनी भाताची सोंगणी करून, पेंढ्या बांधून ठेवल्या आहेत तर काहीजणांनी भात सडकून खळ्यावरच डेपो मारुन ठेवला आहे. त्यामुळे भात भिजून त्याची प्रतवारी खालावण्याचा व पर्यायाने भाताला कमी भाव मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

तसेच पशुधनाचा चारा असलेले तणस सडन काळे पडणार आहे, त्यामुळे अशा चाऱ्याला पशुधनही तोंड लावणार नाही. अजून किती दिवस व किती पाऊस पडेल याचा अंदाज नसल्याने गहू, हरभरा, मसूर, वाटाणा अशा खरिपाची लागवड लांबणार आहे. भाजीपाल्यालाही या अवकाळीचा फटका बसणार असून भाजीपाला सडण्याचा व करपा पडण्याची शक्यता असल्याची भीती बेझे येथील शेतकरी बाळासाहेब आबाजी चव्हाण यांनी सांगितले.

बागायती शेतीची ही नुकसान झाले आहे. द्राक्षपिकाला सर्वाधिक फटका बसून या पावसाने द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची माहिती द्राक्ष उत्पादक राजाराम चव्हाण, नवनाथ रामदास बोडके यांनी दिली. महसूल विभाग व कृषी विभाग यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

दिवसभर रिपरिप पाऊस, सर्वत्र धुक्याचे आच्छादन व वातावरणातील प्रचंड गारवा यामुळे गर्दीवरही परिणाम झाला असून एरव्ही आकाशात विहार करणारे असंख्य पक्षीसुद्धक दिवसभर आडोशाला बसून असल्याचे दिसत होते.

 

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक