शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टीला उशीर; नागरिकांना भुर्दंड

By admin | Updated: September 27, 2014 00:25 IST

दिरंगाई : कासवगती भोवणार; सूटही जाणार

सांगली : भाजपने अखेर सांगलीचे विद्यमान आमदार संभाजी पवार व जतचे आमदार प्रकाश शेंडगे यांची उमेदवारी कापली. आज, शुक्रवारी सांगलीतून शहराध्यक्ष व प्रसिद्ध सराफ व्यावसायिक सुधीर गाडगीळ, तर जतमधून विलासराव जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या घडामोडीनंतर पवार यांचे पुत्र पृथ्वीराज यांनी आता शिवसेनेकडून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी पवार घराण्याने शिवसेना-जनता दल-भाजप आणि पुन्हा शिवसेना असे वर्तुळ पूर्ण केले आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना उमेदवारी देण्यास संभाजी पवार यांनी कडाडून विरोध केला होता. त्यानंतर त्यांनी पाटील यांच्या प्रचारात सहभागी न होता हातकणंगलेतील महायुतीचे उमेदवार राजू शेट्टी यांचा प्रचार केला होता. सांगलीत त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याच्या तक्रारी खा. पाटील आणि निष्ठावंत गटाने केल्या होत्या. आता विधानसभेला त्यांना किंवा त्यांचे पुत्र पृथ्वीराज यांना उमेदवारी दिल्यास भाजप मागे पडेल, अशी भीती व्यक्त करत विरोधकांनी मुंबईत तळ ठोकला होता. खा. पाटील यांनी सुधीर गाडगीळ, शिवाजी डोंगरे, नीता केळकर, हणमंत पवार, धनपाल खोत, अरविंद तांबवेकर यांची नावे पुढे केली होती. नीता केळकर वगळता उर्वरित सर्वांनी खा. पाटील यांना सोबत घेऊन मुंबईत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांची भेट घेतली होती. आपल्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, मात्र संभाजी पवार नकोत, असे त्यांनी निक्षून सांगितले होते. उमेदवारीचा हा तिढा सोडविण्यासाठी भाजपने समिती नेमली होती. या समितीच्या सूचनेनुसार पवार यांच्याऐवजी गाडगीळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.आज, शुक्रवारी सकाळी याबाबतचे वृत्त येऊन धडकताच पवार यांचे कार्यालय असलेल्या मारुती चौकात अस्वस्थता निर्माण झाली. पवार समर्थकांनी कार्यालयावरून पक्षाचे फलक, बॅनर उतरवले. पोस्टर फाडली. उमेदवारी कापल्याचे लक्षात येताच संभाजी पवार यांनी स्वत: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला. यादरम्यान शिवसेनाही त्यांच्या संपर्कात होती. ठाकरे यांनी पवार यांचे पुत्र पृथ्वीराज यांच्या नावाला होकार दर्शविला. शनिवारी शिवसेनेतर्फे त्यांचा अर्ज भरण्यात येणार आहे. पवारांच्या प्रवासाचे शिवसेना-जनता दल-भाजप आणि पुन्हा शिवसेना असे वर्तुळ पूर्ण होणार आहे. पवारांची राजकीय कारकीर्द सांगली पालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून सुरू झाली. भाजपने जतचे आमदार प्रकाश शेंडगे यांचाही पत्ता कट केला. त्यांच्या जागी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या विलासराव जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत खा. संजय पाटील यांचा उघड प्रचार करून मताधिक्य मिळवून दिले होते, तर आ. शेंडगे यांचे तळ्यात-मळ्यात सुरू होते. त्यामुळे खा. पाटील यांनी यांच्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. राष्ट्रवादीच्या दलालाकडून भाजप हायजॅक : पवारसंभाजी पवार यांनी सायंकाळी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजपमधील सर्वजण जयंत पाटील यांना फितूर झाले आहेत. राष्ट्रवादीने जिल्ह्यातील भाजप हायजॅक केला आहे. गेली १२ वर्षे भाजपला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अहोरात्र कष्ट केले, पण त्याचा विचार न करता उमेदवारी कापली. ज्यांना उमेदवारी देण्यात आली, त्यांच्यात पक्षाने काय बघितले? केवळ सांगलीतच नव्हे, तर मुंबईतील भाजप कार्यालयातील वातावरण दूषित झाले आहे. गुन्हेगारांना पक्षात घेऊन पवित्र केले जात आहे. त्यांची हमाली आम्ही करणार नाही. भाजपचे नेते मुख्यमंत्रिपदासाठी हपापले आहेत. अखंड महाराष्ट्राचे स्वप्न साकारायचे असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची धमक उद्धव व राज ठाकरे यांच्यात आहे. त्यामुळेच शिवसेनेत प्रवेश करीत आहे. मीही मूळचा शिवसैनिकच आहे. माझ्यासह शेंडगे यांना उमेदवारी डावलून गोपीनाथ मुंडे गटाचे खच्चीकरण करण्यात आले आहे. आता आम्हाला पंकजा मुंडेंची काळजी वाटते.