शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

ढगाळ, उष्ण वातावरणामुळे शेतकरी हवालदिल

By admin | Updated: April 2, 2017 00:46 IST

खामखेडा : गेल्या आठ दिवसांपासून तपमानात वाढ झाल्याने व अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्याने उन्हाळी कांदा कसा वाचवावा म्हणून शेतकरी चिंतातुर झाला आहे.

 खामखेडा : गेल्या आठ दिवसांपासून तपमानात वाढ झाल्याने व अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्याने उन्हाळी कांदा शेतात काढून ठेवला. उन्हाळी कांदा कसा वाचवावा म्हणून शेतकरी चिंतातुर झाला आहे.उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम हा एप्रिल महिन्यात असतो. त्यामुळे सध्या कसमादे परिसरात उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू असल्याने शेतात सर्वत्र उन्हाळी कांद्याच्या वळी दिसून येत आहेत. कसमादे परिसरात उन्हाळी कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. गेल्या सात-आठ वर्षांपूर्वी या परिसरात डाळिंबाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात होती. त्यामुळे त्यावेळी डाळींब या पिकाकडे हमखास पैसे मिळवून देणारे नगदे पीक म्हणून पाहिले जात असे. त्यावेळी उन्हाळी कांद्याचे पीक अल्प प्रमाणात घेतले जात होते. त्यामुळे कांद्याला भावही चांगला मिळत होता. परंतु गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वी डाळींब पिकावर तेल्या रोगाने तैमान घातल्याने डाळिंबाची शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी डाळींब पिकाकाडे वळल्याने उन्हाळी कांद्याच्या क्षेत्रात वाढ झाली.सध्या पाऊस येण्यासारखे वातावरण तयार झाले आहे. जर यावेळी पाऊस आला तर शेतातील कांदा काढून कांद्याच्या पातीने झाकून ठेवलेला कांदा पावसाने भिजला तर तो शेतातच खराब होईल की काय, याची भीती शेतकऱ्याला वाटत आहे. या ढगाळ वातावरणामुळे अचानक पाऊस आला तर कांदे झाकण्यासाठी कोणाकडे ताडपत्री किंवा प्लॅस्टिक कागद मिळतो का? याची चौकशी शेतकरी करीत आहे. आता काही शेतकरी चाळीत कांदा साठवणूक करीत आहेत. (वार्ताहर)