शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

अति पावसाने पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 3:05 PM

खेडलेझुंगे : जिल्ह्यात अतिपावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परतीच्या पावसामुळे सडलेल्या पिकांचे सर्वेक्षण व पंचनामे झालेले नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झालेला आहे.

ठळक मुद्देबळीराजा हवालदिल : पिकांचे सर्वेक्षण नसल्याने शेतकरी मदतीला मुकणार

खेडलेझुंगे : जिल्ह्यात अतिपावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परतीच्या पावसामुळे सडलेल्या पिकांचे सर्वेक्षण व पंचनामे झालेले नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झालेला आहे. शासनाकडून मदतीची अपेक्षा असतांना नुकसानीचे सर्वेक्षण, पंचनामे करायला यंत्रणाच उपलब्ध नव्हती त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील कोट्यावधी शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.खेडलेझुंगे, रूई, कोळगांव, सारोळे थडी, धारणगांव विर व खडक परिसरात दोन वर्षापासुन शेतीतून पुरेसे उत्पादन नसल्याने मुळे शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयणीय झालेली आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला हा भाग दुष्काळाने होरपळत होता. जुलै आॅगस्ट महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाला होता. आज परतीचा पाऊस जोरात होत असल्याने शेतात पाणी साचून राहिल्याने कांद्याची रोप, टोमॅटो, मका, बाजरी, द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नाले, ओढे, पाट, चाºया वाहत आहेत. त्यामुळे त्यातील जास्तीचे पाणी ही नाले, चाºया, ओढे संबंधित यंत्रणेकडून साफसफाई न झाल्याने त्यातील पाणी शेतातुन वाहत असल्याने मोठ्याप्रमाणावर नुकसान झालेले आहे. यावर्षी पाऊस उशिरा आल्याने आणि भर जोमात पीक असतांना पाण्याचा खंड पडल्याने पिकांचे उत्पादन घटले आहे.कर्जाचा डोंगर पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहे. अशातच परतीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपले आहे. अतिवृष्टीच्या तडाख्याने पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. नुकसान झाल्याने शेतकºयांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. परंतु ़निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु होती. निवडणूक पार पाडण्यासाठी सरकारी यंत्रणा निवडणुकीच्या कामात गुंतलेली असल्याने पिकांचे सर्वेक्षण, पंचनामे करणार कोण असा प्रश्न शेतकर्यांना पडला होता. निवडणुकीच्या कामामुळे सर्व काही ठप्प झाले आहे. शासनाने दिपावलीच्या सुट्टीमध्ये शासकीय यंत्रणेला नुकसान ग्रस्त शेतपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देवुन लवकरात लवकर पंचनामे करु न मदत मिळवुन द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक