शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

सोमवारपर्यंत उष्णतेची लाट : नऊ वर्षांमधील तापमानाचा विक्रम मोडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 6:23 PM

यावर्षी नऊ वर्षांच्या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम शनिवारी (दि.२७) मागे पडला. मागील आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागल्याने नाशिककर अक्षरक्ष: भाजून निघाले आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता हवामान केंद्राकडून ४२.७ अंश इतके उच्चांकी तापमान नोंदविले गेले.

ठळक मुद्दे४२.७ अंश इतके उच्चांकी तापमान नोंदविले गेले. एप्रिलअखेर ४२.७ अंश ही विक्रमी नोंद ठरली

नाशिक : मागील नऊ वर्षांत उन्हाची जेवढी तीव्रता नाशिककरांनी अनुभवली नाही, तेवढी यावर्षी अनुभवयास येत आहे. यंदा तापमानाचा पारा ४२.७ अंशापर्यंत पोहचल्याने मागील नऊ वर्षांमधील तापमानाच्या विक्रमाच्या सर्व नोंदी मागे पडल्या आहेत. यावर्षी नऊ वर्षांच्या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली आहे.मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम शनिवारी (दि.२७) मागे पडला. मागील आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागल्याने नाशिककर अक्षरक्ष: भाजून निघाले आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता हवामान केंद्राकडून ४२.७ अंश इतके उच्चांकी तापमान नोंदविले गेले. १६ एप्रिल २०१० साली ४२ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते. त्यानंतर नऊ वर्षांनी शनिवारी तापमानाचा पारा ४२ अंशापुढे सरकला.मागील पाच ते सहा दिवसांपासून शहरवासीयांना उन्हाच्या कडाक्याने हैराण केले असून हवामान खात्याकडून शनिवारी (दि.२७) पुन्हा उष्णतेची लाट येत्या सोमवारपर्यंत (दि.२९) कायम राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस नाशिककरांना उष्णतेचा कहर अनुभवयास येण्याची दाट शक्यता आहे. नाशिक, अहमदनगर, जळगाव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये या चार दिवसांत उष्णतेची लाट अधिक तीव्र स्वरूपात जाणवणार असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेत उष्माघातापासून स्वत:चा बचाव करण्याच्या घरगुती उपाययोजनांवर भर द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.बुधवारपासून नाशिककर कडक्याच्या उन्हाचा सामना करत आहे. ३८ अंशांवरून तापमानाचा पारा थेट चाळिशीपार पोहचला. ४०.९ अंश इतके तापमान बुधवारी नोंदविले गेले तर गुरुवारी काही अंशी घट होऊन पारा ४०.५ अंशांवर स्थिरावला; मात्र शुक्रवारपासून अचानकपणे वातावरणात कमालीचा उष्मा वाढल्याने मागील दहा वर्षांपेक्षा अधिक तापमान शनिवारी नोंदविले गेले. दिवसभर शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पहावयास मिळत होता. सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर फारशी वर्दळ दिसून आली नाही. सूर्यास्तानंतरही नाशिककरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कारण कमाल तापमानासोबत किमान तापमानाचा पारादेखील मागील चार वर्षांपासून चढता असून किमान तापमान शुक्रवारी २३.२ अंश इतके होते; मात्र शनिवारी किमान तापमानही २८.६ अंशवर पोहचल्याने नागरिकांना रात्रीही प्रचंड उकाडा अनुभवयास आला. २८ मार्चमध्ये या हंगामात पहिल्यांदा पारा चाळीशीपार सरकला तर एप्रिलअखेर कमाल तापमानाची ४२.७ अंश ही विक्रमी नोंद ठरली.उन्हाच्या तडाख्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकHeat Strokeउष्माघातTemperatureतापमानweatherहवामानHealthआरोग्य