शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

सोमवारपर्यंत उष्णतेची लाट : नऊ वर्षांमधील तापमानाचा विक्रम मोडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 18:27 IST

यावर्षी नऊ वर्षांच्या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम शनिवारी (दि.२७) मागे पडला. मागील आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागल्याने नाशिककर अक्षरक्ष: भाजून निघाले आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता हवामान केंद्राकडून ४२.७ अंश इतके उच्चांकी तापमान नोंदविले गेले.

ठळक मुद्दे४२.७ अंश इतके उच्चांकी तापमान नोंदविले गेले. एप्रिलअखेर ४२.७ अंश ही विक्रमी नोंद ठरली

नाशिक : मागील नऊ वर्षांत उन्हाची जेवढी तीव्रता नाशिककरांनी अनुभवली नाही, तेवढी यावर्षी अनुभवयास येत आहे. यंदा तापमानाचा पारा ४२.७ अंशापर्यंत पोहचल्याने मागील नऊ वर्षांमधील तापमानाच्या विक्रमाच्या सर्व नोंदी मागे पडल्या आहेत. यावर्षी नऊ वर्षांच्या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली आहे.मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम शनिवारी (दि.२७) मागे पडला. मागील आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागल्याने नाशिककर अक्षरक्ष: भाजून निघाले आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता हवामान केंद्राकडून ४२.७ अंश इतके उच्चांकी तापमान नोंदविले गेले. १६ एप्रिल २०१० साली ४२ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते. त्यानंतर नऊ वर्षांनी शनिवारी तापमानाचा पारा ४२ अंशापुढे सरकला.मागील पाच ते सहा दिवसांपासून शहरवासीयांना उन्हाच्या कडाक्याने हैराण केले असून हवामान खात्याकडून शनिवारी (दि.२७) पुन्हा उष्णतेची लाट येत्या सोमवारपर्यंत (दि.२९) कायम राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस नाशिककरांना उष्णतेचा कहर अनुभवयास येण्याची दाट शक्यता आहे. नाशिक, अहमदनगर, जळगाव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये या चार दिवसांत उष्णतेची लाट अधिक तीव्र स्वरूपात जाणवणार असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेत उष्माघातापासून स्वत:चा बचाव करण्याच्या घरगुती उपाययोजनांवर भर द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.बुधवारपासून नाशिककर कडक्याच्या उन्हाचा सामना करत आहे. ३८ अंशांवरून तापमानाचा पारा थेट चाळिशीपार पोहचला. ४०.९ अंश इतके तापमान बुधवारी नोंदविले गेले तर गुरुवारी काही अंशी घट होऊन पारा ४०.५ अंशांवर स्थिरावला; मात्र शुक्रवारपासून अचानकपणे वातावरणात कमालीचा उष्मा वाढल्याने मागील दहा वर्षांपेक्षा अधिक तापमान शनिवारी नोंदविले गेले. दिवसभर शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पहावयास मिळत होता. सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर फारशी वर्दळ दिसून आली नाही. सूर्यास्तानंतरही नाशिककरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कारण कमाल तापमानासोबत किमान तापमानाचा पारादेखील मागील चार वर्षांपासून चढता असून किमान तापमान शुक्रवारी २३.२ अंश इतके होते; मात्र शनिवारी किमान तापमानही २८.६ अंशवर पोहचल्याने नागरिकांना रात्रीही प्रचंड उकाडा अनुभवयास आला. २८ मार्चमध्ये या हंगामात पहिल्यांदा पारा चाळीशीपार सरकला तर एप्रिलअखेर कमाल तापमानाची ४२.७ अंश ही विक्रमी नोंद ठरली.उन्हाच्या तडाख्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकHeat Strokeउष्माघातTemperatureतापमानweatherहवामानHealthआरोग्य