शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

माणेकशानगरात घरांमध्ये नळाला गटारीचे पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:39 AM

शहरातील द्वारका परिसरात माणेकशानगरातील दहा ते बारा सोसायट्यांना नळाद्वारे गटारीचे पाणी येत असून, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून केवळ खोदकाम सुरू असून, त्यात कुठलाही दोष सापडलेला नाही आणि दुसरीकडे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत.

नाशिक : शहरातील द्वारका परिसरात माणेकशानगरातील दहा ते बारा सोसायट्यांना नळाद्वारे गटारीचे पाणी येत असून, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून केवळ खोदकाम सुरू असून, त्यात कुठलाही दोष सापडलेला नाही आणि दुसरीकडे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत.महापालिकेच्या वतीने शहर स्मार्ट केले जात आहे. त्यातच जलवाहिन्या बदलून मोठ्या प्रमाणात नवीन जलवाहिन्या टाकल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर स्काडा मीटर बसवून पाणीपुरवठा स्मार्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे स्मार्ट यंत्रणेला गेल्या चार दिवसांपासून साधा फॉल्टदेखील सापडत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.माणेकशानगर येथील न्यू रश्मी, बालाजी, जीवनज्योती अशा विविध सोसायट्या आणि बंगले परिसर असून, त्याठिकाणी महापालिकेच्या जलवाहिनीतून गटारीचे पाणी मिसळले जात आहे. घरातील पाणी काळे आणि दुर्गंधीयुक्त येत असल्याने नागरिकांनी त्यासंदर्भात महापालिकेच्या ई-कनेक्ट अ‍ॅपवर तक्रारी केल्या. त्यानंतर यंत्रणा हालली, मात्र चार दिवसांपासून महापालिकेचे तीन ते चार कर्मचारी येऊन खोदकाम करतात आणि नंतर निघून जातात. फॉल्ट सापडत नाही असे सांगून टाळाटाळ केली जात आहे.नागरिकांना मात्र त्यामुळे काळ्या पाण्याची शिक्षा सहन करावी लागत आहे. परिसरातील सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये काळा गाळ साचला आहे.तातडीने उपाययोजना करण्याची मागणीनागरिकांनी स्थानिक नगरसेवकांकडे तक्रारी करूनदेखील बघतो करतो, असे सांगितले जात आहे. त्याचबरोबर निवडणूक आचारसंहितेमुळे थेट पुढे येऊन काम करता येत नाही असे सांगून नगरसेवक टाळाटाळ करीत करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.४प्रदूषित पाण्यामुळे परिसरात रोगराईचा धोका असून, महापालिकेने त्वरित नागरिकांची या समस्येतून मुक्ती करावी अन्यथा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी