शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

दुष्काळ जाहीर करण्यासाठी सायगावात ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 19:04 IST

येवला तालुक्याचा सतत अवर्षण प्रवण क्षेत्रातील उत्तरपूर्व भाग शासनाने तातडीने दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करावा, यासाठी सायगाव ग्रामस्थांनी दि. ५रोजीयेथील रोकडोबा पारावर विशेष ग्रामसभेचे आयोजन करत ठराव केला.

येवला : येवला तालुक्याचा सतत अवर्षण प्रवण क्षेत्रातील उत्तरपूर्व भाग शासनाने तातडीने दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करावा, यासाठी सायगाव ग्रामस्थांनी दि. ५रोजीयेथील रोकडोबा पारावर विशेष ग्रामसभेचे आयोजन करत ठराव केला. ठरावाच्या प्रती राज्य शासनाचे लोकप्रतिनिधी व प्रशासनाला पाठविणार असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. योगिता भालेराव होत्या.येवला तालुक्याचा उत्तरपूर्व भाग सतत दुष्काळाच्या छायेत असतो. या भागातील शेतीला पर्यायी सिंचनाची सुविधा नसल्याने येथील शेती ही निसर्गाच्या लहरीवरच अवलंबुन आहे. अशा अत्यल्प पावसाने कधी खरीप तर कधी रब्बी हंगाम वाया जातो. चालु हंगामात आपुर्या पर्जन्यमानामुळे मका, बाजरी, कपाशी पिके करपली. उत्पादन खर्चही भागणार नाही,येवढे उत्पादन घटले. तरीहीराज्यात दुष्काळ जाहिर करतांना शासनाने येवला तालुका वगळला. सरकारच्या या भेदनितीचा सायगाव ग्रामस्थांनी ग्रामसभेतुन खरपूस समाचार घेत जाहिर निषेध नोंदवला.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कापुस पणन महासंघाचे सल्लागार समतिीचे संचालक भागुनाथ उशीर म्हणाले की, येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भाग हा कायमच दुष्काळग्रस्त असून पन्नास टक्केंपेक्षा कमी पिक आणेवारी असणाº्या६४गावांचा समावेश गंभीर दुष्काळ म्हणून जाहिर करावी.मागील वर्षापासून आजतागायत उत्तरपूर्व भागातील१४गावांना ट्रँकरद्वारा पाणीपुरवठा केला जात आहे. येथील शेती निसर्गाच्या स्वाधीन आहे. चालु खरिप हंगामातील पिके उध्वस्त झाली. उत्पादन खर्चही न भागल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. तत्वत: कर्जमाफिच्या दृष्टचक्र ात सापडलेल्या शेतकº्यांना दोन वर्षापासून पिककर्जाचे वाटप नाही. पिण्याच्या पाण्यासह गुरांच्या चारा पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. अशा भिषण परिस्थित शासनाने तात्काळ या भागातील गावांना दुष्काळ जाहिर करून न्याय द्यावा. अशी मागणी ग्रामस्थांनी केली. रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतमजूरांना गाव परिसरात रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते वसंतराव खैरनार यांनी केली.याप्रसंगी शरद भालेराव,शिवाजी भालेराव,अ‍ॅड. सुभाष भालेराव, उपसरपंच दिनेश खैरनार,संजय पेंढारे,गुलाबराव दारूंटे आदीनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी अ‍ॅड. आर.डी.खैरनार, विजय खैरनार, भागीनाथ उशीर,सुनिल देशमुख,गणपत खैरनार,गोरख भालेराव, बशीर शेख, रघुनाथ खैरनार, ज्ञानेश्वर भालेराव, गणपत उशीर, कचरू गाडेकर, छगन उशीर, प्रविण भालेराव, भाऊसाहेब आहिरे, बंडु निघुट, प्रल्हाद दारूंटे, संजय देशमुख,बाबुराव पठारे, दिलीप ढाकणे, लहानु भालेराव, कारभारी देव्हडे, आंबादास उशीर, प्रविण खैरनार, बबन ढाकणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभेचे प्रास्ताविक व आभार ग्रामसेवक बोडखे यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ