शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

गीता माळी यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 01:03 IST

शहापूरनजीक झालेल्या अपघाताने मृत्युमुखी पडलेल्या गायिका गीता माळी यांना अमरधाममध्ये अखेरचा निरोप देताना नाशिकच्या कलाकार आणि रसिकांना अश्रुंचा बांध रोखणे अनावर झाले होते.

नाशिक : शहापूरनजीक झालेल्या अपघाताने मृत्युमुखी पडलेल्या गायिका गीता माळी यांना अमरधाममध्ये अखेरचा निरोप देताना नाशिकच्या कलाकार आणि रसिकांना अश्रुंचा बांध रोखणे अनावर झाले होते. नाशिकचा हा स्वरपक्षी शुक्रवारी दुपारी अनंतात विलीन झाला.मुंबईहून कारने परतताना गुरुवारी दुपारी अपघाती निधन झालेल्या गीता माळी यांच्यावर शुक्रवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गीता यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नाशिकच्या लहान-मोठ्या कलाकारांसह हजारो कलारसिक उपस्थित होते. शुक्रवारी सकाळी गीता यांच्या सातपूर येथील निवासस्थानी कलाप्रेमी रसिकांची अंत्यदर्शनासाठी रीघ लागली होती. गीता यांची अशी चटका लावून जाणारी वार्ता समजल्यापासून त्यांच्या निवासस्थानी अश्रुंचा महापूर वहात होता. सातपूरच्या निवासस्थानापासून निघालेली अंत्ययात्रा कालिदास कलामंदिरात आणण्यात आली. कालिदासमध्ये अंत्यदर्शन घेण्यासाठी उसळलेल्या गर्दीला कालिदासचे प्रांगणदेखील अपुरे पडले होते. कालिदासमध्ये नाट्य परिषदेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. तिथे काही काळ पार्थिव दर्शनासाठी ठेवून तिथून पार्थिव प. सा. नाट्यगृहात आणल्यानंतर सावानाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. नाशिक अमरधामला नेऊन अग्नीडाग देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, अविराज तायडे, मकरंद हिंगणे, दत्ता पाटील, प्रिया तुळजापूरकर, मोहन उपासनी, विनोद राठोड यांच्यासह शेकडो रंगकर्मी, कलाकार, जनस्थान ग्रुपचे सदस्य आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. १९ नोव्हेंबरला सावानाच्या औरंगाबादकर सभागृहात सर्व कलाकार, रसिकांच्या वतीने शोकसभा होणार आहे.आॅर्केस्ट्रा असोसिएशनतर्फे शोकसभाकालिदास कलामंदिराच्या प्रवेशद्वारापाशी शुक्रवारी सायंकाळी गीता यांच्या निधनाबद्दल जिल्हा आॅर्केस्ट्रा असोसिएशनतर्फे शोकसभा घेण्यात आली. संघटनेचे संस्थापक उमेश गायकवाड, नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम, सुनील ढगे यांनी गीता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शोकभावना व्यक्त केल्या. गायकवाड यांनी गीता या उत्कृष्ट कलाकाराबरोबर उत्कृष्ट व्यक्ती असल्याचे सांगितले. गीताचा अपघाती मृत्यू हा काळजाला चटका लावणारा असल्याचे ढगे यांनी सांगितले. कारकिर्द ऐन बहरात असताना तिचे अकाली जाणे यावर विश्वासच बसत नसल्याचे जयंत पाटेकर म्हणाले. यावेळी वीरेंद्रसिग परदेशी, नंदू देशपांडे, रवी बराथे, विजय महंत, नवीन तांबट, राजेंद्र जाधव, प्रिति जैन, प्रदीप जगताप यांनीदेखील अनेक आठवणी ना उजाळा देत माळी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

टॅग्स :Deathमृत्यूNashikनाशिक