शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

स्वातंत्र्यदिनानंतर सरकारची लक्तरे वेशीवर : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 6:04 PM

‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने रविवारी (दि.२९) भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात संवाद यात्रेअंतर्गत जिल्हा मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात आंबेडकरप्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देभाजपा सरकार आणि नरेंद्र मोदी यांची लक्तरे चव्हाट्यावर आणण्याची मोहीम हाती घेऊशेतकऱ्यांना हमीभाव वाढीचे दिलेले आश्वासन हे फसवे मोदी सरकार जाती-धर्माचे विष कालवणारे म्हणून लोकांपुढे आले.

नाशिक : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समतेचे पाईक नसून विषमतेला खतपाणी घालणारे आहे. कॉँग्रेस सरकारचा नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याने लोकांनी त्यांना सत्तेवरून बाजूला केले आणि भाजपाला बहुमत दिले. यामुळे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले; मात्र या चार वर्षांत मोदी सरकार कॉँग्रेसपेक्षाही अधिक निष्क्रिय आणि जाती-धर्माचे विष कालवणारे सरकार म्हणून लोकांपुढे आले. आगामी स्वातंत्र्यदिनानंतर मोदींची लक्तरे वेशीवर टांगल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी राहणार नाही, असा एल्गार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी जिल्हा मेळाव्यात पुकारला.‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने रविवारी (दि.२९) भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात संवाद यात्रेअंतर्गत जिल्हा मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात आंबेडकरप्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष पवन पवार, खंडेराव पाटील, किशोर दमाळे, अ‍ॅड. विजय मोरे, बाजीराव तिडके, जावेद मुन्शी, अ‍ॅड. अरुण जाधव यांसह विविध बारा बलुतेदार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी समाजबांधवांनी ‘बोलो-बोलो जय भीम’चा नारा बुलंद करत अवघे सभागृह दणाणून सोडले. यावेळी आंबेडकर म्हणाले, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाच्या पंतप्रधानांचे होणारे भाषण हे महत्त्वाचे असते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्यातील अन् देशातील वातावरण अस्थिर करण्याचा आमचा हेतू नाही; मात्र स्वातंत्र्यदिनानंतर भाजपा सरकार आणि नरेंद्र मोदी यांची लक्तरे चव्हाट्यावर आणण्याची मोहीम हाती घेऊ.

मोदींनी या देशातील शेतकऱ्यांना हमीभाव वाढीचे दिलेले आश्वासन हे फसवे आहे; कारण या सरकारने अंदाजपत्रकात अन्नधान्य खरेदीसाठी तशी कुठलीही तरतूद केलेली नाही. जेव्हा या देशातील शेतक-यांना हे लक्षात येईल, की सरकारने रंगविलेले हमीभाववाढीचे स्वप्न भंगले आहे, तेव्हा केंद्राकडून लोकसभेची निवडणूक जाहीर केली जाईल, असे आंबेडकर यावेळी म्हणाले. आगामी निवडणुकांमध्ये आपल्या मताचा योग्य वापर करून आश्वासनांची खैरात आणि विषमता पोसणारे मनुवादी व्यवस्थेला खतपाणी घालणारे सरकार उधळून लावण्याचे महत्त्वाचे कार्य बहुजनांना करायचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNashikनाशिक