शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

गर्दी जमली म्हणजे मते मिळालीच असे नव्हे !

By श्याम बागुल | Published: January 15, 2019 3:32 PM

कोरेगाव भीमा येथील गेल्या वर्षाच्या जातीय दंगलीनंतर दलित संघटनांच्या डझनभर नेत्यांपैकी फक्त प्रकाश आंबेडकर यांनी ठोस भुमिका घेत दलीतांच्या बचावासाठी महाराष्टÑ बंदची हाक दिली व त्याला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. या एकमेव घटनेतून दलित समाज एकाएकी एकत्र येण्यास सुरूवात झाली,

ठळक मुद्दे दलीतांना एमआयएमची कट्टर धर्मांधता मानवेल काय नाशिक येथे प्रकाश आंंबेडकर यांची सभा ज्या भव्य-दिव्य व प्रचंड गर्दीने पार पडली

श्याम बागुलनाशिक : दलीतांना काळाराम मंदिराचे कवाडे खुली करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्या नाशिकच्या भुमीत सत्याग्रह करण्याची वेळ आली,त्याच भुमीत त्यांचे नातु अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा व विधासभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून एमआयएमसोबत जाहीर सभा घेवून घडविलेले शक्तीप्रदर्शनाने अन्य राजकीय पक्षांच्या छातीत धडकी भरणे स्वाभाविक असले तरी, ज्या सत्तेविरूद्ध प्रकाश आंबेडकर दलित-मुस्लिमांना एकत्र करून रान पेटवित आहे, त्या दलीतांना एमआयएमची कट्टर धर्मांधता मानवेल काय हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे जाहीरसभेपुरती मोठी गर्दी जमली म्हणजे त्याचे रूपांतर मतांमध्ये होतेच असे नाही, या अनेकांच्या अनुभवाशी प्रकाश आंबेडकरांना निवडणुकीनंतर सहमत व्हावेच लागेल.कोरेगाव भीमा येथील गेल्या वर्षाच्या जातीय दंगलीनंतर दलित संघटनांच्या डझनभर नेत्यांपैकी फक्त प्रकाश आंबेडकर यांनी ठोस भुमिका घेत दलीतांच्या बचावासाठी महाराष्टÑ बंदची हाक दिली व त्याला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. या एकमेव घटनेतून दलित समाज एकाएकी एकत्र येण्यास सुरूवात झाली, त्याचाच नेमका फायदा प्रकाश आंबेडकरांनी उठविला व खऱ्या अर्थाने त्याचे राजकीयकरण सुरू झाले. केंद्र व राज्य सरकार विरोधातील वातावरणाचा लाभ एकीकडे घेत असताना दुसरीकडे समविचारी पक्षांसोबत निवडणूक लढविण्याची तयारी आंबेडकर यांनी दर्शविली परंतु त्यांच्या या तयारीकडे आजही दलीत समाज संशयाने पाहत आहे. कॉँग्रेसशी निवडणूक बोलणी करायची परंतु राष्टÑवादी नको असे दुसरीकडे म्हणायचे, लोकसभेत आंबेडकरांचा एकही प्रतिनिधी नसताना थेट बारा जागांची मागणी करायची व अचानक एमआयएम या पक्षाशी निवडणूक युती करून प्रचाराचा रणश्ािंग फुंकायचा, त्याच बरोबर नको असलेल्या राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेवून राजकीय चर्चा घडवाची, जाहीर सभेतून सेना-भाजपावर टोकाची टिका करून त्यांना निवडणूक युतीसाठी एकत्र येण्यासाठी भाग पाडायचे अशा एक नव्हे एकाच वेळी अनेक खेळी प्रकाश आंबेडकर खेळत आहे. त्यामुळे त्यांच्या एकूणच भूमिकेविषयी संशय व्यक्त होणे साहजिक असून, भारतीय संविधानाला दुय्यम स्थान देवून कट्टर धर्मांधता जोपासणा-या एमआयएम यासारख्या पक्षाला सोबत घेण्याची त्यांची भूमिकाही तितकीच अनाकलनीय आहे. एकीकडे संविधानाला हात लावण्यास विरोध करायचा व दुसरीकडे संविधानाला आव्हान देणा-या पक्षाबरोबर निवडणूक युतीचा समझोता करायचा हा आंबेडकर यांच्या दुटप्पीपणाबाबत दलीत समाजात संभ्रम आहे. नाशिक येथे प्रकाश आंंबेडकर यांची सभा ज्या भव्य-दिव्य व प्रचंड गर्दीने पार पडली त्याबाबत त्यांचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे, कारण गोल्फ क्लब मैदानावर सभा घेण्याचे धाडस ज्या काही मोजक्याच पक्षांमध्ये आहे त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला स्थान मिळाले आहे. आंबेडकर यांनी निवडणूक पुर्व तयारीत मारलेली बाजी यशस्वी ठरली असली तरी, याच गोल्फ क्लबच्या मैदानावर लाखोंच्या सभा घेणा-या राजकीय पक्षांना मात्र निवडणुकीत सभेतील गर्दी इतकी मते मिळाली नाहीत हा देखील इतिहास आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन