शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या नियमांवर भाषेचे भवितव्य अवलंबून नाही

By admin | Updated: February 27, 2017 01:33 IST

नाशिक : मराठी भाषेचे भवितव्य शासनाच्या नियमावर अवलंबून नाही,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी ‘विशाखा’ पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले.

उत्तम कांबळे : मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला विशाखा पुरस्कार सोहळ्याचे वितरणनाशिक : मराठी भाषेवर गंभीर चर्चा होत नाही ही मराठी भाषेची शोकांतिका आहे. मराठी भाषेचे भवितव्य शासनाच्या नियमावर अवलंबून नाही, तर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कितपत चर्चा केली जाते यावर अवलंबून आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा पत्रकार उत्तम कांबळे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे आयोजित ‘विशाखा’ पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले. महाकवी कालिदास मंदिर येथे रविवारी (दि. २६) या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीचे विशाखा पुरस्कार योगिनी सतारकर - पांडे (नांदेड), मोहन कुंभार (सिंधुदुर्ग) आणि विष्णु थोरे (चांदवड, नाशिक) यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उत्तम कांबळे यांनी पुढे बोलताना जागतिकीकरणामुळे तसेच खासगीकरणामुळे समाजापुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. तसेच ती मराठी भाषेपुढेदेखील आहेत. भाषेशी असलेल्या नातेसंबंधांवर भाषेचे भविष्य अवलंबून असल्याचे कांबळे यांनी यावेळी सांगितले. भाबडेपणाने भाषेचा व्यवहार करण्यापेक्षा भाषा संवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे याकडे कांबळे यांनी यावेळी लक्ष वेधले. मनोगत व्यक्त करताना पुरस्कारार्थींनी आपली जबाबदारी अधिकच वाढली असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव दिनेश भोंडे यांनी केले, तर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण केंद्राच्या संचालक डॉ. विजया पाटील यांनी विशाखा पुरस्काराविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी आपल्या मनोगतातून पुरस्कारप्राप्त कवींचे अभिनंदन केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत आणि दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम पाडेकर यांनी केले. (प्रतिनिधी)हे पुरस्कारार्थी सन्मानितविशाखा पुरस्काराअंतर्गत यावर्षीचा प्रथम पुरस्कार नांदेड येथील कवयित्री डॉ. योगिनी सातारकर - पांडे यांच्या ‘जाणिवांचे हिरवे कोंभ’ या कविता संग्रहाला मिळाला. एकवीस हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. द्वितीय पुरस्कार सिंधुदुर्ग येथील कवी मोहन कुंभार यांच्या ‘जगण्याची गाथा’ या काव्यसंग्रहास मिळाला. पंधरा हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, तर तिसरा क्रमांक चांदवड, नाशिक येथील कवी विष्णू थोरे यांच्या ‘धूळपेरा उसवता’ या काव्यसंग्रहाला मिळाला. दहा हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.