शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: May 4, 2017 00:24 IST

वाढत्या घटना : उपाययोजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

 नाशिक : जिल्ह्यात कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना कायम असून, गेल्या दोन दिवसांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने शेतकरी आत्महत्येच्या घटनांची संख्या तीसच्या घरात पोहोचली आहे. सध्याची परिस्थिती पाहता शेतकरी नैराश्येत सापडले असताना शासकीय व प्रशासकीय पातळीवर मात्र हात बांधण्यापलीकडे काहीच केले जात नाही. सोमवारी १ मे महाराष्ट्रदिनी निफाड ताालुक्यातील उगाव येथे राहणारे शंकर सखाराम जगताप (५२) या शेतकऱ्याने गळफास घेऊन, तर बागलाण तालुक्यातील कंधाणे येथील नितीन कडू बिरारी (२५) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना कायम असताना दुसऱ्याच दिवशी मंगळवारी त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. सुरगाणा तालुक्यातील हनुमंतपाडा येथील भगवान नानू गावित (४५) या शेतकऱ्याने अंगावर घासलेट ओतून स्वत:ला पेटवून घेतले, त्याला उपचारार्थ हलविले असता तेथेच त्याचा मृत्यू झाला. या चौघांच्या आत्महत्येने जिल्ह्णात आजवर ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, त्यात तरुण शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तथापि, प्रशासकीय पातळीवर शेतकरी आत्महत्येची आकडेवारी गोळा करण्यापलीकडे काहीच केले जात नाही. शासनाने गेल्या वर्षीच शेतकरी आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाला सूचना केल्या आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सावरण्यासाठी शासकीय योजनांतून मदत करण्याबरोबरच कर्जबाजारी शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यासाठी मेळावे भरविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. विशेष म्हणजे सुरगाणा या आदिवासी भागातही आत्महत्येचे लोण पसरू लागले असून, प्रशासकीय पातळीवर मात्र याबाबत उदासीनता आहे.शेतकरी महिलेची आत्महत्याजिल्ह्णातील निफाड तालुक्यात एका शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याची घटना यंदा पहिल्यांदाच घडली आहे. गेल्या वर्षीही एका शेतकरी महिलेने आत्महत्या केली होती. निफाड तालुक्यातील गाजरेवाडी येथे राहणारी अश्विनी संदीप गाजरे हिने माहेर धारणगाव येथे वडिलांच्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली तिच्या नावावर गाजरेवाडी येथे शेती नाही; मात्र वडिलांच्या नावावर शेती आहे. त्यामुळे प्रशासनाने गाजरे यांच्या आत्महत्येप्रकरणी सविस्तर अहवाल मागविला आहे. शेतकऱ्याचे विष प्राशनजायखेडा/द्याने : कर्जाचा वाढता बोजा त्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेती पिकांचे झालेले नुकसान यामुळे करंजाड येथील शेतकरी सुनील शांताराम देवरे (३१) यांनी कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. शांताराम देवरे यांच्या नावावर ३ एकर शेती असून ते कुटूंबाचा उदरिनर्वाह करतात. त्याच्यावर करंजाड विविध कार्यकारी सोसायटीचे १ लाख ५० हजार रु पयांचे पिक कर्ज तसेच ४० हजारांचे सोने तारण कर्ज होते. गारपीटमुळे त्यांच्या पिकाचे नुकसान झाले. या नैराश्यातून सुनील देवरे यांनी जीवन यात्रा संपवली. त्याच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी, आई, वडील, दोन भाऊ असा परीवार आहे.