शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 02:15 IST

शेतकऱ्यांच्या कांद्याची खरेदी करणाºया व्यापाऱ्यांना साठवणूक करण्याची क्षमता वाढवून देण्यात यावी व कांद्याचे सध्या कोसळत असलेले दर पाहता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लादलेली बंदी उठवावी यासाठी आपण येत्या दिवसांत दिल्लीत संबंधितांची भेट घेणार असल्याची माहिती माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली.

ठळक मुद्देशरद पवार : बळीराजासाठी कर्जमाफीची व्याप्ती वाढविण्याचीही तयारी

नाशिक : शेतकऱ्यांच्या कांद्याची खरेदी करणाºया व्यापाऱ्यांना साठवणूक करण्याची क्षमता वाढवून देण्यात यावी व कांद्याचे सध्या कोसळत असलेले दर पाहता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लादलेली बंदी उठवावी यासाठी आपण येत्या दिवसांत दिल्लीत संबंधितांची भेट घेणार असल्याची माहिती माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली. तोटा सहन करणाºया शेतकºयांना दोन पैसे जादाचे मिळत असतील तर असे निर्णय मागे घेणेच योग्य असते अशी पृष्टीही त्यांनी जोडली.शुक्रवारी शरद पवारनाशिक जिल्ह्णाच्या दौºयावर आले असता त्यांनी संवाद साधला. (पान ५ वर)शेतकºयांना सरसकट कर्जमाफीमिळालेली नसल्याच्या प्रश्नावरबोलताना पवार म्हणाले, सध्या राज्य सरकारने राज्यातील शेतकºयांचे दोन लाख रुपये कर्जमाफ केले आहे. त्याची संख्या एकूण कर्जदार शेतकºयांच्या जवळपास ८५ टक्के इतकी आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांना त्याचा फायदा झाला नाही त्यांची संख्या १५ टक्के इतकी आहे. ती संख्या त्यामानाने कमी आहे. परंतु अशा शेतकºयांनाही कर्जमाफीचा कसा लाभ देता येईल, त्याचबरोबर नियमित कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांनादेखील कसा मोठा दिलासा देता येईल याचा निर्णयही घेतला जाईल. परंतु त्यासाठी मार्चमध्ये अर्थसंकल्पात तरतूद करावी लागेल. त्याबाबत सरकारमधील लोक निर्णय घेतील, असेही पवार यांनी सांगितले. राज्यात अवकाळी पावसामुळे फळबागांचे प्रचंड नुकसान झाले, त्यासाठी शेतकºयांना ३५ हजारांपर्यंतची मदत देण्यात आली आहे, ती अपुरी असल्याचे मान्य आहे. परंतु फळबागा लागवडीचा व त्यांना मदतीचा प्रश्न केंद्राच्या अखत्यारित येत असल्यामुळे त्या संदर्भातही आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या सरकार काम करीत नसल्याची टीका केल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, सध्या राज्याचे मंत्री बारा ते पंधरा तास काम करीत असून, ते घरी येत नसल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्याकडे करण्यास सुरुवात केल्याचे मिश्किलपणे सांगून पवार यांनी, गेली पाच, सहा वर्षे राज्यात जनतेची कामे झाली नसल्यामुळे जनता आता आपल्या कामांसाठी मंत्र्यांकडे गर्दी करीत आहे, त्यामुळे मंत्रालयाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावा मागण्याच्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या वादात आपल्याला पडायचे नाही अशा शब्दात पवार यांनी स्वत:ला त्यापासून दूर ठेवले. मात्र स्व. इंदिरा गांधी यांच्याबाबत संजय राऊत यांनी स्टेटमेंट करायला नको होते, अशी आमची सर्वांची भावना होती. परंतु राऊत यांनी स्वत:च त्यांचे वक्तव्य मागे घेतल्याने हा प्रश्न आता चर्चेचा राहिला नसल्याचे पवार यांनी सांगितले.माझ्या शेजारीपण हाजी मस्तान !करीम लाला-इंदिरा गांधी भेटीवरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन सरकारचे गुन्हेगारांशी संबंध असल्याच्या आरोपावर बोलताना शरद पवार यांनी, राजकीय व्यक्ती वा मंत्र्यांना भेटायला येणाºया प्रत्येक व्यक्तीविषयी माहिती असतेच असे नसते. माझ्याबाबतीतही असाच प्रकार घडला होता. १९७२ मध्ये मुंबईत महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाची सभा होती. सभा आटोपली व दुसºया दिवशी वृत्तपत्रात बातमी आली ‘शरद पवार यांच्याशेजारी हाजी मस्तान बसले’ आता राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर शेजारी कोण बसले आहे हे माहिती नसते व एखाद्या व्यक्तीला व्यासपीठावरून उठून जा, असे सांगता येत नसते असे सांगून पवार यांनी या संदर्भातील चर्चा निरर्थक असल्याचे पटवून दिले.

टॅग्स :NashikनाशिकSharad Pawarशरद पवारonionकांदा