शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

पाणी करारासाठी अखेर मनपाकडून कागदपत्रे सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 2:20 AM

गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या करारासाठी अखेर महापालिकेने पुन्हा एकदा कमीपणा घेत जलसंपदा विभागाला कागदपत्रे सादर केली आहेत त्यानंतर आता हा करार मार्गी लागण्याची शक्यता आहे.

नाशिक : गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या करारासाठी अखेर महापालिकेने पुन्हा एकदा कमीपणा घेत जलसंपदा विभागाला कागदपत्रे सादर केली आहेत त्यानंतर आता हा करार मार्गी लागण्याची शक्यता आहे.नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेत महापालिकेने जलसंपदा विभागाकडून वाढीव पाणीपुरवठ्याची हमी घेतल्यांनतर गेल्या २०११ पासून हा करार रखडला आहे. किकवी धरणच बांधले नसताना त्यामुळे बाधित सिंचन पुनर्स्थापनेचा खर्च जलसंपदा विभाग मागत असून, त्यामुळे हा उभय विभागात मतभेद सुरू झाले होते. जलसंपदा विभाग अव्वाच्या सव्वा रक्कम तर मागत आहेच शिवाय पाणीपुरवठ्याचा करारदेखील करीत नाही, असे प्रशासनाचे म्हणणे होते. महापालिकेने अनेकदा कराराची कागदपत्रे सादर केली तसेच स्टॅँप पेपर सादर करूनही जलसंपदा विभाग करार करण्यास टाळाटाळ करीत होताच, शिवाय करार केला नाही म्हणून महापालिकेला दीड ते दोन पट जादा दर आकारून देयके पाठविली जात होती.तीन महिन्यांपूूर्वी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हा मुद्दा मांडल्यानंतर त्यांनी तातडीने करार करण्याचे आदेश दिले होते. महापालिकेने तशी इच्छाही प्रदर्शित केली होती. मात्र तरीही जलसंपदा विभागाने पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आदेश मानण्यास टाळाटाळ सुरू केली उलट महापालिकेकडेच कागदपत्रांची मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेने कागदपत्रे सुपूर्द केली आहेत.किकवी धरण न बांधताच महापालिकेकडे बाधित सिंचन क्षेत्राचा पुनर्स्थापना खर्च मागितला जात असून, त्यावर जलसंपदा विभागाच्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय घेऊ, असे सांगितले होते. परंतु अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी