शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

निसाकाच्या १५ संचालकांचे अखेर राजीनामे सादर

By admin | Updated: August 15, 2014 00:28 IST

निसाकाच्या १५ संचालकांचे अखेर राजीनामे सादर

भाऊसाहेबनगर : निफाड सहकारी साखर कारखान्याच्या १५ संचालकांनी कारखाना सहकारी तत्त्वावर चालविणे अवघड असल्याचे सांगत आपल्या संचालकपदाचे राजीनामे कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक भागवत भंडारे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संचालक डी. बी. मोगल म्हणाले की, कारखान्याची आर्थिक परिस्थिती, कर्जाचा वाढलेला डोंगर, संचित तोटा, उसाचा अनियमित पुरवठा यामुळे कारखाना सहकारी तत्त्वावर चालविणे अशक्यच असून, कारखाना सरकारी मदतीशिवाय चालविणे शक्य नसल्याचे सांगितले. सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी त्यांनाही निमंत्रण दिले होते. परंतु नारायण शिंदे हे सभासद वगळता एकही सभासद उपस्थित राहिला नसल्याने सभासद आमच्या राजीनाम्याच्या निर्णयाशी सहमत असल्याचे डी. बी. मोगल म्हणाले.कारखाना चालू रहावा यासाठी सहभागी तत्त्वावर किंवा खासगी तत्त्वावर चालविण्यास द्यावा, यासाठी संचालकांनी भरपूर प्रयत्न केले. परंतु सहभागी किंवा खासगीत चालविण्यास दिल्यास तालुक्यातील राजकारण्यांना कारखान्याची सत्ता उपभोगता येणार नाही त्यामुळे केवळ राजकारणासाठी कारखान्यांची वाताहात पुढाऱ्यांनीच लावली असल्याचा आरोप मोगल यांनी केला. संचालक बाळासाहेब जाधव यांनी कारखान्याची संपूर्ण आर्थिक परिस्थिती विशद करून कारखाना सहभागी तत्त्वावर देण्यासंदर्भात २९ मे २०१२ चे सभेत कोअर कमिटीचे अहवालावर निर्णय घेण्याचे ठरले. कारखान्याचे संचालक मंडळ अस्तित्वात असताना कमिटी तयार करण्याचा निर्णय दुर्दैवी होता. कारखान्यांचा संचित तोटा १५० कोटी बँका, शासकीय व इतर देणी २६६ कोटी ३७ लाखांची असल्याने सहकारी तत्त्वाऐवजी शासकीय स्तरावरून कार्यवाही व्हावी यासाठी संचालकपदाचे राजीनामे देत असल्याचे संचालक मंडळाने स्पष्ट केले. संचालक देवराम मोगल, बाळासाहेब जाधव, अ‍ॅड. शांताराम बनकर, हिरालाल सानप, दिलीपराव मोरे, अंबादास कापसे, उद्धव कुटे, बबनराव पानगव्हाणे, दिनकर मत्सागर, लक्ष्मणराव टर्ले, एकनाथ डुंबरे, बबनराव सानप, शहाजी डेर्ले, दौलतराव मुरकुटे, श्रीमती गंगूबाई कदम आदि १५ संचालकांनी संचालकपदाचे राजीनामे भंडारे यांच्याकडे दिले. सदर राजीनामे पुढील कार्यवाहीसाठी प्रादेशिक सहसंचालक अहमदनगर यांच्याकडे पाठविणार असल्याचे भंडारे यांनी स्पष्ट केले आहे.दिलीपराव बनकर, राजेंद्र कटारनवरे, शिवाजी गडाख यांच्यासह सुभाष होळकर यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला. परंतु त्यांनी पुढे कोणत्याही कामकाजात सहभाग घेतला नाही. विद्यमान अध्यक्ष भागवत बोरस्ते, रावसाहेब रायते, कचरू राजोळे, सौ. सिंधुताई खरात, सौ. लीलावती तासकर हे यावेळी अनुउपस्थित होते. त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिलेले नाहीत. (वार्ताहर)वक्तृत्व स्पर्धेत दिव्या साळुंके तृतीयसिन्नर : येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयाची विद्यार्थिनी दिव्या संजय साळुंके हिने मविप्रच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.