शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

नाशिकरोडला दुषित पाण्याने रोगराईची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 11:57 PM

नाशिकरोड : कोरोना विषाणूमुळे सर्वजण त्रस्त असताना नाशिकरोड परिसराच्या काही भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना इतर आजारांना तोंड देण्याची पाळी आली आहे. याकडे कोणीच गांभीर्याने लक्ष देत नसल्याने रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देरहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नाशिकरोड : कोरोना विषाणूमुळे सर्वजण त्रस्त असताना नाशिकरोड परिसराच्या काही भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना इतर आजारांना तोंड देण्याची पाळी आली आहे. याकडे कोणीच गांभीर्याने लक्ष देत नसल्याने रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.गेल्या सात महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या उपद्रवामुळे सर्वजण त्रस्त झाले आहेत. यामध्ये अनेकांचे बळी गेले आहेत. शासन व नागरिक हातात हात घालून लढा देत असताना दुसरीकडे मात्र मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नाशिकरोड भागातील जय भवानीरोड, देवळालीगाव, आर्टिलरी सेंटररोड व इतर भागांमध्ये गेल्या काही दिवसापासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना विविध आजाराशी सामना करावा लागत आहे. दूषित पाणी रहिवाशांना उकळून व गाळून पिण्याची पाळी आली आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. पाणीपुरवठ्याची पाईपलाईन लिकेज असल्याचा संशय असून त्यामधून दूषित पाणी मिसळले जात आहे. पाण्याचा दुर्गंधी सारखा वास येत आहे. तसेच पाण्यामध्ये दूषित पाणी व घाण मिसळत असल्याने नागरिकांना जुलाब, घशाचा त्रास, अंग दुखणे आदी त्रास होत आहे. त्यामुळे फॅमिली डॉक्टरकडे रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मनपा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ दूषित पाणीपुरवठा रोखता कसा येईल त्याचे उपाय योजना करणे गरजेचे आहे.

 

 

 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य