शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

संततधार पावसामुळे शेतकरी समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 11:02 PM

दिंडोरी : तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या तीन दिवसांपासून वरुणराजाने हजेरी लावण्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

ठळक मुद्देदिंडोरी तालुक्यातील पश्चिम भागात भात आवणीला सुरुवात

दिंडोरी : तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या तीन दिवसांपासून वरुणराजाने हजेरी लावण्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा भीजपाऊस पडत असल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. दडी मारलेल्या पावसाने तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी हैराण झाले होते. मात्र, सध्या पावसाचे आगमन झाल्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागात भात आवणीच्या कामाला मोठा वेग आला आहे.भात आवणी करताना गाळ करण्यासाठी चांगल्या पावसाची आवश्यकता असते; परंतु सध्या पावसाचे उशिरा आगमन झाल्यामुळे तसेच भाताचे रोप जास्त दिवसाची झाल्यामुळे बळीराजाने जास्त पावसाची वाट न पाहता कमी पावसावर भात आवणीला प्रांरभ केला आहे.दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी भात पिकाकडे व्यापारी दृष्टिकोन ठेवून सध्या भातशेती करीत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी शेतकरी ज्या जातीच्या तांदळाला बाजारात जास्त मागणी आहे, अशा जातीची भात बियाणे खरेदी करून रोप टाकत आहेत. यात इंद्रायणी, कोळपी, दप्तरी, भोगावती, महालक्ष्मी, लालकोर आशा विविध जातींची बियाणे वापरली जातात.गेल्या तीन ते चार वर्षांपासून या परिसरातील भात उत्पादक शेतकऱ्यांनी इंद्रायणी जातीच्या भाताला मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचे दिसून येत आहे. या भागातील शेतकरी भात शेतीसाठी कुंडी वाफा, दलदल वाफा, जमीन पायरी टप्प्यात वाफा पद्धतीने भात शेती लागवड करीत आहेत. यासाठी संततधार पावसाची खूप गरज असते.दिंडोरीच्या पश्चिम पट्ट्यात अशा स्वरूपाचा पाऊस कायमच पडत असल्यामुळे भात पिकाला पोषक वातावरण निर्माण होत असल्यामुळे या परिसराला भाताची नगरी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. (२१ दिंडोरी)

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती