शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

कांदा अनुदानापासून नायगाव खोऱ्यातील शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 6:55 PM

नायगाव : शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी मदतीबरोबरच शेतकऱ्यांचे कांदा अनुदानही लांबल्यामुळे नायगाव खो-यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शासनाने जाहीर केलेले अनुदान लवकर देण्याची मागणी केली जात आहे.

वर्षभरापासून अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शासनाने दुष्काळी मदतीची घोषणा करून बळीराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.मात्र जाहीर केलेली मदत अजुनही शेतक-यांना मिळाली नाही. तसेच प्रतिकुल परिस्थितीत पिकविलेल्या शेती मालास बाजारात मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांना दुष्काळी मदतीपाठोपाठ कांदा पिकास प्रती क्विंटल दोनशे रूपये अनुदान जाहीर केले. मात्र सहा महिने होऊनही शेतकरी अजुनही या अनुदानाच्या प्रतिक्षेतच आहे. यंदा भीषण दुष्काळी परिस्थती निर्माण झाल्याने शेतकरी पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चा-याच्या टंचाईमुळे हैराण झाले आहेत. वर्षभर आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना दुष्काळी मदत व कांदा अनुदानाची रक्कम अजूनही मिळाली नसल्यामुळे आर्थिकदृष्ट्या हैराण झालेल्या शेतक-यांना शासनाने जाहीर केलेली मदत लवकर बँक खात्यावर जमा करण्याची मागणी देशवंडी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम डोमाडे यांच्यासह नायगाव खोºयातील शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी