शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

गायी सांभाळण्यास शेतकरी समर्थ

By admin | Updated: January 1, 2017 00:19 IST

कराडकर : नंदिनी गोशाला व्याख्यानमाला

नाशिक : महाराष्ट्रात गोवंश हत्त्याबंदी कायदा लागू झाल्यानंतर भाकड गायी सांभाळाव्या लागणार असल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्त्या करण्याची वेळ येईल, अशी टीका करणाऱ्यांना तथा गोवंश हत्त्याबंदी कायद्याच्या विरोधकांना वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष बंडातात्या कराडकर यांनी शनिवारी शंकराचार्य संकुलातील व्याख्यानात चांगलेच फटकारले. महाराष्ट्रात गो हत्त्या बंदी कायदा अस्तित्वात येणे हे वारकरी संप्रदायाचे यश असून, देशभरात हा कायदा अस्तित्वात येणे गरजेचे सांगतानाच देशातील शेतकरी गायी सांभाळण्यास समर्थ असल्याचे मत कराडकर यांनी व्यक्त केले. व्यासपीठावर नंदिनी गोशाळेचे अध्यक्ष नेमीचंद पोद्दार, कार्याध्यक्ष एम. एन.पाटील, वसंत खैरनार, महेश पाटील आदि उपस्थित होते. कराडकर म्हणाले, महाभारतात श्रीकृष्णाचा सांभाळ नंद राजाने केला होता. त्याकाळात नऊ लाख गायी असणाऱ्या गोपालकास नंद ही उपाधी दिली जात होती. त्यावेळी गोकूळ व मथुरेत असे नंद अनेक होते. यावरून त्यावेळच्या गोधनाची व भारताच्या संपन्नतेची जाणीव होऊ शकते. आपला देश हा शेकडो वर्षांपासून सधन व संपन्न आहे. या संपन्नतेचे माध्यम व साधन हे गोमाता आहे. यामुळे तिची सेवा हीच खरी देश सेवा आहे. इतिहास पाहता ५०० वर्षे देशावर राज्य करणाऱ्या मोघलांनी गोहत्त्येस राजमान्यता दिली नव्हती. परंतु, भारताच्या संपन्नतेचे गमक गायीमध्ये असल्याचे लक्षात आल्यानंतर इंग्रजांनी मात्र गोहत्त्येस राजमान्यता दिली गायीपासून उस्तर्जित होणारे दूध, गोमूत्र, शेण असे सर्व पदार्थ मानवी शरीरास आरोग्य देणारे आहेत. असे कराडकर यांनी सांगितले.