शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

ब्राह्मणगावच्या शेतकऱ्याने तोडली द्राक्षबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 3:55 PM

ब्राह्मणगाव : गेल्या चार - पाच वर्षांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व सततच्या नैसर्गिक संकटांना वैतागून येथील द्राक्ष उत्पादक योगेश अरुण अहिरे यांनी पाच एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवून तिला बुडासकट काढून टाकली. ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकावर मोठी अवकळा आली असून, परिसरातील बऱ्याच द्राक्ष बागा तोडल्या जात आहेत.

चार - पाच वर्षांपासून शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. तरीही शेतकरी मोठी आर्थिक झळ सोसत शेती करीत आहेत. मात्र, सध्या ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, दाट धुके, अती ऊन, त्यातच पिकांवरील महागडी औषधे, वाढती शेतमजुरी, पिकांना खर्चापेक्षा मिळणारा कमी भाव याला कंटाळून येथील चंद्रकांत गोविंद अहिरे, योगेश अरुण अहिरे यांनी आपल्या द्राक्ष बागा कुऱ्हाडीने बुडासकट तोडून टाकल्या.सध्या तर सर्वच पिकांना नैसर्गिक संकटांचा त्रास वाढला असून, कांदा पिकालाही अनेक रोगांनी ग्रासले आहे. गव्हाचे क्षेत्र पूर्णपणे घटले असून, कांदा पिकाकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक अपेक्षा होत्या. मात्र, त्यालाही ढगाळ वातावरणाचा फटका बसत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती